शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

छोट्याशा खोलीत गुदमरतोयं चिमुकल्यांचा श्वास

By admin | Updated: February 22, 2015 00:53 IST

उमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन...

नितीन मुसळे सास्तीउमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन होऊन योग्य धडे मिळाल्यास भविष्यात एक सुंदर पिढी निर्माण होण्यास मदत होते. त्याकरिता शासनाच्या वतीने विविध भागात आंगणवाड्या चालविल्या जात आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही. भाड्याच्या आणि अतिशय छोट्या खोल्यांमध्ये चिमुकल्यांना धडे गिरवावे लागत आहे. या छोट्या खोल्यांमध्ये बालकांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे दहा वर्षांपासून लहान बालकांना एका लहानग्या पडक्या इमारतीत बाळकडू पाजल्या जात होते. परंतु दिर्घ प्रतीक्षेनंतर एक सुसज्ज इमारत मिळाली. परंतु त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने आजही लहान बालके लहानग्या खोलीत आपले भविष्य घडवित आहे. कोरपना तालुक्यांंतर्गत असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतीत जैतापूर येथील अंगणवाडी पाणलोट क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या एका अरुंद खोलीत मागील तीन वर्षांपासून अंगणवाडी सुरू आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने सन २०१३ मध्ये अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आज बांधकाम होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असूनही त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने इमारत रिकामी पडलेली आहे. रिकाम्या पडलेल्या या नवीन इमारतीत गावात कामासाठी येणारे कामगार निवासासाठी आसरा घेत आहेत. उद्घाटनापूर्वीच इमारतीची फरशी फुटलेली आहे तर खिडक्यांची तावदानेसुद्धा तुटलेले असून उद्घाटनाअभावी इमारतीची दुरावस्था होत असल्याचे दिसून येत आहे.मागील दहा वर्षांपासून पडक्या अंगणवाडीच्या इमारतीत लहान बालकांना आपले लहानपणीचे शिक्षण घ्यावे लागले आणि आज इमारत असूनसुद्धा दहा बाय पंधरा फुट क्षेत्रफळ आकाराच्या खोलीत शिक्षण घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. ज्या ठिकाणी लहान बालकांना श्वास गुदमरतो, त्याच ठिकाणी त्यांना बाळकडू घ्यावे लागत आहे. शासन गोरगरीब जनतेच्या कल्याणाचे हित समोर ठेवून करोडो रुपयांच्या योजना आखत असते. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शासनाच्या करोेडो रुपयांच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्या निर्रथक ठरत आहे.