शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

छोट्याशा खोलीत गुदमरतोयं चिमुकल्यांचा श्वास

By admin | Updated: February 22, 2015 00:53 IST

उमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन...

नितीन मुसळे सास्तीउमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन होऊन योग्य धडे मिळाल्यास भविष्यात एक सुंदर पिढी निर्माण होण्यास मदत होते. त्याकरिता शासनाच्या वतीने विविध भागात आंगणवाड्या चालविल्या जात आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही. भाड्याच्या आणि अतिशय छोट्या खोल्यांमध्ये चिमुकल्यांना धडे गिरवावे लागत आहे. या छोट्या खोल्यांमध्ये बालकांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे दहा वर्षांपासून लहान बालकांना एका लहानग्या पडक्या इमारतीत बाळकडू पाजल्या जात होते. परंतु दिर्घ प्रतीक्षेनंतर एक सुसज्ज इमारत मिळाली. परंतु त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने आजही लहान बालके लहानग्या खोलीत आपले भविष्य घडवित आहे. कोरपना तालुक्यांंतर्गत असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतीत जैतापूर येथील अंगणवाडी पाणलोट क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या एका अरुंद खोलीत मागील तीन वर्षांपासून अंगणवाडी सुरू आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने सन २०१३ मध्ये अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आज बांधकाम होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असूनही त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने इमारत रिकामी पडलेली आहे. रिकाम्या पडलेल्या या नवीन इमारतीत गावात कामासाठी येणारे कामगार निवासासाठी आसरा घेत आहेत. उद्घाटनापूर्वीच इमारतीची फरशी फुटलेली आहे तर खिडक्यांची तावदानेसुद्धा तुटलेले असून उद्घाटनाअभावी इमारतीची दुरावस्था होत असल्याचे दिसून येत आहे.मागील दहा वर्षांपासून पडक्या अंगणवाडीच्या इमारतीत लहान बालकांना आपले लहानपणीचे शिक्षण घ्यावे लागले आणि आज इमारत असूनसुद्धा दहा बाय पंधरा फुट क्षेत्रफळ आकाराच्या खोलीत शिक्षण घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. ज्या ठिकाणी लहान बालकांना श्वास गुदमरतो, त्याच ठिकाणी त्यांना बाळकडू घ्यावे लागत आहे. शासन गोरगरीब जनतेच्या कल्याणाचे हित समोर ठेवून करोडो रुपयांच्या योजना आखत असते. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शासनाच्या करोेडो रुपयांच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्या निर्रथक ठरत आहे.