शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

धुरांच्या लोंढ्यामुळे सास्तीवासीयांचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। गाव कोळसा खाणींनी वेढले, वाढत्या प्रदूषणामुळे दम्याच्या व डोळ्यांच्या रूग्णात वाढ

नितीन मुसळे।लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलिच्या विविध कोळसा खाणींने वेढलेल्या सास्ती गावातील जनता मागील अनेक वर्षापासून धुरांच्या लोंढ्यात जगत असून या धुरातून निघणाऱ्या विविध विषारी वायूमुळे अनेकांना दम्याच्या व डोळ्यांच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांच्याही प्रकृतीवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी अशा विविध भूमिगत व खुल्या खाणी सास्ती गावाच्या परिसरात असून काही खाणी तर अगदीच गावाला लागून आहेत. या कोळसा खाणीतील कोळसा वाहतूकसुद्धा सास्ती गावाजवळून होत असल्याने कोळशाची धूळ, जळालेल्या कोळशाचा धूर, कोळशातून निघणारा विविध विषारी वायू नागरिकांना आजाराच्या खाईत लोटत आहे.कोळशाच्या शेगडीचाही धूरशासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोळशाच्या ज्वलनानंतर विविध विषारी वायू बाहेर पडत असतात. ते विषारी वायू अत्यंत हानीकारक असून आरोग्यास धोकादायक आहे. ही गंभीर बाब आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळीच या धुरावर व धुळीवर आळा न घातल्यास भविष्यात सास्तीवासीय जनतेला हदयाच्या रोगापासून कुणीही वाचवू शकणार नाही, हे मात्र खरे.सास्ती गावात मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग वास्तव्यास आहे. गरिबीमुळे स्वयंपाकासाठी त्यांना कोळशाच्या शेगडीचा वापर करावा लागत आहे. उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत अनेकांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाले असले तरी अनेक गरीब जनता यापासून वंचित आहे. त्यांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाल्यास यावर आळा बसू शकते.- रमेश पेटकर, सरपंच सास्तीकोळसा खाण परिसरात पसरलेली धूळ, सोबतच जळालेल्या कोळशातून निघणारा धूर आरोग्यास अत्यंत धोकादायक असून यामुळे परिसरातील जनतेला हदयाच्या रोगासोबतच दमासारख्या रोगाला बळी पडावे लागत आहे. तर धुळीमुळे डोळ्यांच्या आजाराच्या रूग्णातही वाढ होत आहे.- डॉ. ए. डी. जाधव,वैद्यकीय अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली (बू.)