शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धुरांच्या लोंढ्यामुळे सास्तीवासीयांचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। गाव कोळसा खाणींनी वेढले, वाढत्या प्रदूषणामुळे दम्याच्या व डोळ्यांच्या रूग्णात वाढ

नितीन मुसळे।लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलिच्या विविध कोळसा खाणींने वेढलेल्या सास्ती गावातील जनता मागील अनेक वर्षापासून धुरांच्या लोंढ्यात जगत असून या धुरातून निघणाऱ्या विविध विषारी वायूमुळे अनेकांना दम्याच्या व डोळ्यांच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांच्याही प्रकृतीवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी अशा विविध भूमिगत व खुल्या खाणी सास्ती गावाच्या परिसरात असून काही खाणी तर अगदीच गावाला लागून आहेत. या कोळसा खाणीतील कोळसा वाहतूकसुद्धा सास्ती गावाजवळून होत असल्याने कोळशाची धूळ, जळालेल्या कोळशाचा धूर, कोळशातून निघणारा विविध विषारी वायू नागरिकांना आजाराच्या खाईत लोटत आहे.कोळशाच्या शेगडीचाही धूरशासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोळशाच्या ज्वलनानंतर विविध विषारी वायू बाहेर पडत असतात. ते विषारी वायू अत्यंत हानीकारक असून आरोग्यास धोकादायक आहे. ही गंभीर बाब आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळीच या धुरावर व धुळीवर आळा न घातल्यास भविष्यात सास्तीवासीय जनतेला हदयाच्या रोगापासून कुणीही वाचवू शकणार नाही, हे मात्र खरे.सास्ती गावात मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग वास्तव्यास आहे. गरिबीमुळे स्वयंपाकासाठी त्यांना कोळशाच्या शेगडीचा वापर करावा लागत आहे. उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत अनेकांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाले असले तरी अनेक गरीब जनता यापासून वंचित आहे. त्यांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाल्यास यावर आळा बसू शकते.- रमेश पेटकर, सरपंच सास्तीकोळसा खाण परिसरात पसरलेली धूळ, सोबतच जळालेल्या कोळशातून निघणारा धूर आरोग्यास अत्यंत धोकादायक असून यामुळे परिसरातील जनतेला हदयाच्या रोगासोबतच दमासारख्या रोगाला बळी पडावे लागत आहे. तर धुळीमुळे डोळ्यांच्या आजाराच्या रूग्णातही वाढ होत आहे.- डॉ. ए. डी. जाधव,वैद्यकीय अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली (बू.)