शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गोरजा येथील मुख्य रस्त्याला भगदाड

By admin | Updated: May 17, 2015 01:29 IST

येथून जवळच असलेल्या गोरजा येथे मुख्य रस्त्यावर बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

घोडपेठ : येथून जवळच असलेल्या गोरजा येथे मुख्य रस्त्यावर बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महामार्गावरून चार किलोमिटर आतमध्ये असलेले गोरजा हे गाव ब-याच सोयी सुविधांपासून वंचित आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या आवश्यक गोष्टींसाठी गोरजावासियांना घोडपेठ किंवा भद्रावती येथे जावे लागते. गोरजा येथे अजुनपर्यंत महामंडळाची बसही पोहचली नाही. त्यामुळे गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान यासारख्या स्वच्छतेला प्रोत्साहन देणा-या योजना राबविण्यात येत आहेत. मात्र गोरजा येथील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेबद्दल जागरूक नसल्याचा प्रत्यय येत आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याला भलेमोठे भगदाड पडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा खड्डा ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी बाजूलाच आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या बाबीवर पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला एखाद्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या रस्त्याची ताबडतोब दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)