शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या चाकासह अपघातावरही ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देएप्रिल महिन्यात जिल्हाभरात केवळ १२ अपघात : गतवर्षीच्या तुलनेत संख्या घटली

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता जिल्ह्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. या लॉकडाऊनमध्ये वाहनांची चाके थांबल्याने अपघातही थांबल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात केवळ १२ अपघातांची नोंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटल्याचे चित्र आहे.२२ मार्चला जनता कर्फ्यू झाल्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली देशभरात हा लॉकडाऊ न ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वाहनांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे. मात्र ४ मे पूर्वी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्वच वाहने थांबली होती. त्याचा एका बाजूने सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.गतवर्षी एप्रिल महिन्यात जिल्हाभरात ५७ अपघातांची नोंद झाली होती. यामध्ये २७ जणांचा मृत्यू तर ४३ जण गंभीर जखमी झाले होते. यावर्षीचा संपूर्ण एप्रिल महिना लॉकडाऊनमध्येच गेला. त्यामुळे यावर्षी एप्रिलमध्ये केवळ १२ अपघात झाले असून ४ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षीच्या मार्च आणि एप्रिल महिन्यातील आकडेवारी पाहता यावर्षी अपघात, त्यातील मृत आणि जखमीची संख्या कमालीची घटल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊ न शिथील केल्यानंतर आता वाहने रस्त्यावर धावत आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील वर्दळ कमी होऊन अपघातावरही ब्रेक लागला आहे.ब्लॅक स्पॉटही झाले अपघातविरहितएखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होणे, त्यात चारपेक्षा अधिक नागरिकांचा जीव जाणे असे जिल्ह्यात सुमारे २८ ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी प्रशासनातर्फे जनजागृती फलकही लावण्यात आले आहेत. मात्र २३ मार्च ते १८ मे या कालावधीत वाहतूक निरीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीतून अत्यल्प अपघात झाले आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूचे वाहन वगळता एकही वाहन धावले नाही. लालपरीसुद्धा बंद होती. परिणामी रस्त्यावरील वर्दळ शांत होती. याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला असून अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.लॉकडाऊनच्या काळात अपघाताचे प्रमाण अत्यल्प आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन खरेदी करुन देतानाच वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालविण्याच्या सूचना कराव्या, अनेकदा युवक वाहनावरच मोबाईलद्वारे संभाषण करुन गाडी चालवताना दिसतात. त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पालकांनीसुद्धा पाल्यांना समज द्यावी.-हृदयनाथ यादव,वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Accidentअपघात