शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

ब्रह्मपुरीचा ‘उकडा’ सातासमुद्रापार, दररोज ५०० टन तांदळाची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 14:37 IST

Chandrapur News ब्रह्मपुरी तालुका हा तांदळाचे आगार म्हणून ओळखला जातो. येथील तांदळाला आता विदेशातूनही मागणी होऊ लागली आहे.

रवी रणदिवे

लोकमत न्यूज नेटवर्क

 चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुका हा तांदळाचे आगार म्हणून ओळखला जातो. येथील तांदळाला आता विदेशातूनही मागणी होऊ लागली आहे. रोज सुमारे ५०० टन तांदूळ थेट विदेशात जात आहे. सातासमुद्रापार जात असलेल्या या तांदळाचे नाव ‘उकडा’ असे आहे. ११० जातीच्या धानापासून हा तांदूळ होतो. यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या एका टोकावर असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्याची ओळख सातासमुद्रापार झाली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यात जवळपास १५ राईस मिल आहेत. तेथे साध्या तांदळापासून उकडा तांदळाचे उत्पादन घेतले जाते. रोज ५०० टन उकडा तांदूळ साऊथ आफ्रिका, दुबई, सिंगापूर, केनिया या देशांना पाठवला जातो. येथील राईस मिलमध्ये तांदळाची निर्मिती झाल्यानंतर हा तांदूळ विशिष्ट वजनाच्या पिशव्यांमध्ये पॅक केला जातो. नंतर ट्रकने नागपूरला तेथून रेल्वेने मुंबईला व नंतर जहाजाने त्याची विदेशात निर्यात होते.

ब्रह्मपुरी तालुक्यात २९ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते आहे. शेतकरी काही धान वर्षभराच्या उपजीविकेसाठी शिल्लक ठेवून उर्वरित धानाची विक्री करतो. धानविक्रीचा हा हंगाम नोव्हेंबरपासून जुलै महिन्यापर्यंत चालतो. उच्च प्रतीच्या धानाला दोन हजार सहाशेपर्यंत भाव मिळत आहे.

दक्षिण आफ्रिका, दुबई, सिंगापूर व केनिया या देशांतून तांदळाची मागणी आहे. रोज ५०० टन तांदूळ निर्यात केला जात आहे. समुद्रसपाटीच्या भागात असलेल्या विदेशांतील नागरिकांकडून ही मागणी अधिक आहे.

- डॉ. नितीन उराडे, उद्योजक, साई राईस मिल, ब्रह्मपुरी.

टॅग्स :agricultureशेती