शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतामध्ये आग लावणाऱ्यांवर आळा घाला

By admin | Updated: May 14, 2017 00:36 IST

शेतामध्ये बेजबाबदारपणे आग लावण्यात येते. अशा आगी लावणाऱ्यांवर आळा बसावा, ...

पर्यावरणप्रेमींची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतामध्ये बेजबाबदारपणे आग लावण्यात येते. अशा आगी लावणाऱ्यांवर आळा बसावा, यासाठी पर्यावरण समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, पर्यावरण प्रेमी राकेश राऊत, अतम मेश्राम, नितेश दोडके, मनी राय यांच्या नेतृत्वात चिमूरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.उन्हाळी हंगाम संपत आला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सर्वप्रथम शेतातील काटे, अनावश्यक झुडुपे व इतर इजा पोहोचविणारे वृक्ष जाळण्यासाठी आगीचे वनवे लावतात. त्या आगीमुळे शेतातील झाडांचा राखरांगोळी होत आहेत. आगीमुळे सुमारे १००० ते २००० च्या आसपास झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होत आहे. अशा प्रकारचे विदारक चित्र चिमूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.दिवस संपत आला की रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतामध्ये वनवा लावून घराकडे निघून जातात. त्यामुळे शेतातील झाडे जळून खाक होण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्याचबरोबर त्या झाडावर असणारे पशुपक्षी यांचा निवारा हरपला असून त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात वनवा लावल्यानंतर तो वनवा शेतामधून इतरत्र जंगलाकडे वळतो आणि त्यामुळे जंगलाला आग लागून जंगलाची राख रांगोळी होण्याच्या घटना घडत असतात.या वनव्यामुळे पशुपक्षी, वन्यजीव व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना धोका पोहोचत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. बेजबाबदारपणे वनवे लावणाऱ्यावर आळा बसावा, यासाठी काहीतरी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे चिमूर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून अनावश्यक झुडपे जाळल्यास वनवा इतरत्र पसरणार नाही आणि जंगल पेटणार नाही, असे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे.