शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

राज्यातील ३३६ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 05:52 IST

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत.

- राजेश मडावीचंद्रपूर : दोन आठवड्यांपासून राज्यभरातील ३३६ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने उपचाराअभावी हजारो रूग्णांचे हाल होत आहेत. रक्तपेढ्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार अपेक्षित रक्तसंकलन होत नसल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही चिंता व्यक्त केली आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयासह विविध रूग्णालयांमध्ये दररोज किमान ५००० ते ६००० रक्ताच्या पिशव्यांची मागणी केल्या जात आहे. परंतु, रक्तपेढ्यांमध्ये मागणी करूनही रक्त मिळत नसल्याने रूग्णांचे कुटुंबीय हतबल आहेत. यावर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत दिवाळी सणासुदीचा कालखंड होता. सलग सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याचा मार्गच बंद झाला. राज्यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये १० ते १२ दिवस पुरेल इतक्याच रक्ताच्या पिशव्या उपलब्ध असल्याची माहिती सूत्राने दिली.राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, हे खरे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद आदींसह शासनाच्या विविध विभागांनी रक्तदान श्ाििबरांचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाकडून यासाठी विशेष प्रयत्न केल्या जात आहे.-डॉ. अरूण थोरात, सहाय्यक संचालक रक्त संक्रमण परिषद, मुंबई

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी