शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

कापूस खरेदी न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:21 IST

सीसीआयद्वारे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी गुरुवारी चंद्रपूर - आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. तत्काळ कापूस खरेदी करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देरस्त्यावर वाहनांच्या रांगा सीसीआय कापूस खरेदी अचानक बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीसीआयद्वारे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी चंद्रपूर - आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. तत्काळ कापूस खरेदी करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.मागील अनेक दिवसांपासून कापूस विक्रीकरिता शेतकरी सीसीआय केंद्राजवळ भरलेल्या कापसाच्या बैलबंडी व मिनीडोअर रांगेत लावून ठेवत आहेत. आपला कापूस केव्हा विकला जाईल, याकडे शेतकरी नजरा लावून आहेत. काही शेतकऱ्यांच्या गाडया लागून कापूस विक्रीसुद्धा सुरू होती.मात्र अचानक दोन दिवस कापूस विक्री केंद्र बंद राहणार असे सांगण्यात आले. याबद्दल कोणतीही माहिती शेतकऱ्यांना पुरविण्यात आली नाही. बंद असले तरीदेखील सीसीआय केंद्रात काही मोजक्या लोकांच्या गाडया घेण्यात आल्या. मात्र गुरुवारी शेतकरी आपला कापूस विक्रीकरिता गेले असता सीसीआय कर्मचाऱ्यांनी थेट नकार देत कापूस घेतला जाणार नाही. केंद्र बंद आहे, असे सांगितले. केंद्राच्या अरेरावी धोरणावर रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी राजुरा-आदिलाबाद मार्ग कोरपना तालुक्यातील सोनुर्ली या गावाजवळ रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. रस्ता रोखल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, आपला कापूस खरेदी करणार नाही, तोपर्यंत हे चक्काजाम आंदोलन असेच येथे सुरू राहणार, असे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन