शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा

By admin | Updated: March 12, 2016 01:21 IST

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, पवनी खदानीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येत आहे.

विधानसभेत होणार चर्चा : दोषींवर कारवाईची मागणीबी.यु. बोर्डेवार राजुरावेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, पवनी खदानीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून शक्तीशाली ब्लास्टिंग करण्यात येत आहे. यामुळे गोवरी येथील शिवाजी विद्यालय व गोवरी गावातील अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. ही बाब गंभीर असून शेकडो शालेय विद्यार्थी व नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहे. हा प्रश्न राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी विधानसभेत उपस्थित केला असून यावर दोन दिवसात विधानसभेत चर्चा होणार आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत गोवरी, पवनी, परिसरात वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे घरांना, गाळांना तडे पडत असल्याचा अहवाल या भागातील तलाठ्यांनी दिला आहे. बल्लारपूर क्षेत्रात जमिनीमधून जास्त कोळसा निघावा, या हेतुने शक्तीशाली क्षमतेपेक्षा जास्त बारूदचा वापर करून ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे विधानसभेत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या खदानी मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी नियमाची पायमल्ली होत आहे. परंतु याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकाचे जीवन धोक्यात आणण्याचे काम वेकोलि करीत आहे. राजुरा परिसर नक्षलग्रस्त भाग असून वेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात बारूदचा वापर केला जातो. ही बारुद येते कुठून, त्याचा वापर कसा होत आहे, याचीसुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे.वेकोलिच्या खदानीमुळे गोवरी येथील शाळेचे विद्यार्थी शाळेमध्ये बसायला घाबरत असून झाडाखाली बसत आहे. गोवरी गावातील नागरिकसुद्धा भयभीत झाले आहे. वेकोलि मोठ्या प्रमाणात कोळसा भुगर्भातून काढताना नागरिकांना त्रास होऊ नये याचा विचार करीत नाही. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त वापर करुन नागरिकांना त्रास दिला जात आहे. याला वेकोलि गोवरी, पवनीचे वेकोलिचे अधिकारी जबाबदार असून अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणार नाही तेव्हापर्यंत हा प्रकार थांबणार नाही, असे बोलले जात आहे.