शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

मुख्याधिकाऱ्याच्या कक्षासमोर फोडले मडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:54 IST

चिमूर शहरातील नागरिक मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करीत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन दिले. मात्र यावर त्यांनी काहीही केले नाही. नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना व महिलांना दुसºया वॉर्डात भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देतीव्र आंदोलन : चिमुरात संतप्त महिलांचा पाण्यासाठी आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहरातील नागरिक मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी आणण्यासाठी भटकंती करीत आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन दिले. मात्र यावर त्यांनी काहीही केले नाही. नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांना व महिलांना दुसºया वॉर्डात भटकावे लागत आहे. या प्रकाराने त्रस्त होऊन महिला व नागरिकांनी सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा पालिकेवर धडकताच शेकडो महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी मुख्यधिकारी यांना धारेवर धरले. त्यांच्या दालनासमोरच महिलांनी सोबत आणलेले मडके फोडून आपला संताप व्यक्त केला.यादरम्यान, काही वेळासाठी नगरपरिषदेचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता. मुख्यधिकारी शहा यांनी आठ दिवसात टँकर लावून पाणी देऊ, अशी ग्वाही दिली. तेव्हा महिला शांत झाल्या. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप खोलवर गेले आहे. पाण्याचे स्रोत आटायला लागले आहेत. ५१ कोटी रुपयांची २४/७ ही पाणी पुरवठा योजना न्यायालयात अडकली आहे. ज्या नगरपालिकेला शासनाने पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली. तीच नगरपालिका बांधकाम करण्याचे कारण पुढे करून या योजनेविरोधात न्यायालयात गेली आहे. त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.चिमूर शहरासह समाविष्ट अनेक गावातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण असून कुठे पाईपलाईन अपूर्ण कुठे टाकी अपूर्ण तर कुठे विहीर अपूर्ण. असे असताना त्या गावातील नागरिकांना या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दूरवरून किंवा दुसºया वॉडार्तून महिलांना पाणी आणावे लागत आहे. ही परिस्थिती एप्रिलमध्ये असून मे, जून हे उन्हाळ्यातील महिने बाकीच आहे. तालुका दुष्काळ ग्रस्त असून नगरपरिषद प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे होते. मात्र एप्रिलमध्ये भिषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तर पुढील महिने कसे काढायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला.दरम्यान, हा संताप सोमवारी रस्त्यावर निघाला. आज प्रभाग १० चे नगरसेवक सतीश जाधव, प्रभाग १५ चे नगरसेवक नितीन कटारे, आबिद शेख, भाजपचे तालुका उपाध्यक्ष हरीश पिसे यांच्या नेतृत्वाखाली ोकडो महिला नगरपरिषदेवर मडके, घागरी घेऊन धडकल्या. यात जेष्ठ महिला, तरुणींचाही समावेश होता. पाणी मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, पाणी नाही तर टॅक्स नाही, अशा घोषणा देत महिलांनी नगरपालिका समोर मडके फोडले, मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोरील पोर्चमध्ये मडके फोडून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात नगरसेविका छाया कनचलवार, उषा हिवरकर, हेमलता ननावरे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.मुख्याधिकाऱ्यांना सवालन.प. हद्दीतील चिमूर व समाविष्ट करण्यात आलेल्या १३ गावातील नागरिकांना सात दिवस २४ तास पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी विषेश प्रयत्न करून राज्य शासनाकडून ५१ कोटी रुपयांची योजना मंजूर करून आणली होती. या योजनेचे काय झाले, असा सवाल नागरिकांनी यावेळी मुख्याधिकारी शहा यांना विचारला. तेंव्हा ती योजना न्यायालयात असून न्यायालये जे आदेश देईल, ते पाहूनच पुढील कार्यवाही होईल, असे सांगितले.