शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काळा पैसा ठेवणारे प्राप्तीकर विभागाच्या रडारवर

By admin | Updated: June 6, 2017 00:31 IST

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने नोट बंदी केली. त्यामुळे अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी जनधन खात्याचा व इतर साधनांचा वापर केला.

खातेदारांच्या चौकशीसाठी वर्ष लागेल : भाजप प्रदेश प्रवक्त्यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने नोट बंदी केली. त्यामुळे अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी जनधन खात्याचा व इतर साधनांचा वापर केला. मात्र काळा पैसा ठेवणारे प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून त्यांची चौकशी करून नावे घोषित करण्यास जवळपास आणखी एक वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती भाजप पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या वर्षशताब्दीनिमीत्त केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमीत्त पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक चंद्रपुरात आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी केंद्र शासनाने तीन वर्षाच्या कार्यकाळात राबविलेल्या योजनांची माहिती देऊन शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, काळा पैसा रोखण्यासाठी एसआयटीची स्थापना करून विदेशात हवालाच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशावर बंदी आणण्यात केंद्र सरकारला यश आले.याचबरोबर शासनाने जीएसटीसारखा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.या निर्णयाचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच दोन कोटी रोजगाराची निर्मीती, मुद्रा कर्ज योजना, जनधन योजनेबाबत माहिती दिली. नोटाबंदी दरम्यान किती जणांनी जनधन खात्यात पैसे जमा केले, या प्रश्नाला उत्तर देताना काळा पैसा बाळगणारे प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची चौकशी करून केंद्र शासन त्यांची नावे जाहीर करणार आहे. आता मात्र किती जणांनी जनधन खात्यात पैसा जमा केले, याचा निश्चीत आकडा सांगता येणार नाही, असे सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, रामपाल सिंग यांची उपस्थिती होती.