शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

गाडेगावच्या स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार

By admin | Updated: June 7, 2014 23:50 IST

गेल्या अनेक वर्षांपासून गाडेगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य व केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. यावर नियंत्रण आणून दुकानदारावर कारवाई व्हावी याठी गावकर्‍यांनी अनेकदा संबंधित

गडचांदूर : गेल्या अनेक वर्षांपासून गाडेगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य व केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. यावर नियंत्रण आणून दुकानदारावर कारवाई व्हावी याठी गावकर्‍यांनी अनेकदा संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या. मात्र काहीच निष्पन्न न झाल्याने ग्रामवासीयांनी विशेष आमसभेची मागणी केली. त्यानुसार शनिवारी देवानंद आनंदराव ठाकरे यांचा सरकारी स्वस्त धान्य केंद्राचा परवाना रद्द करण्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. ग्रामसभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे आजघडीला संपूर्ण बीपीएल, एपीएल व अंत्योदय अशा सर्वच शिधापत्रिका दुकानदाराकडेच असून ग्राहकांना त्या मिळाल्या नाहीत. अन्न सुरक्षा योजनेची यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. शिधापत्रिकाधारकांना धान्य व केरोसीनचा पुरवठा जादा भावाने करण्यात येत आहे. भावदर्शक फलक लावण्यात आले नाही. याबाबत वारंवार निवेदने देऊनसुद्धा कोणत्याही पुरवठा अधिकार्‍यांनी चौकशी करण्याची गरज दाखविली नाही. २९ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी व कोरपना तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांनी साधी चौकशी करण्याचे सौजन्यही दाखविले नसल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.देवानंद ठाकरे हे गावचे पोलीस पाटील असून सरकारी स्वस्त धान्य दुकान, केरोसीन परवाना, किराणा दुकान व कृषी केंद्राचे ते मालक आहेत. स्वत:च्या किराणा दुकानातून ते सरकारी स्वस्त धान्य विकत असल्याचाही गावकर्‍यांचा आरोप आहे. अंत्योदय व बीपीएलधारकांना अनुक्रमे ३५ ते ४४ किलो तांदूळ व गहु वाटप करायचे असतात. तसेच तांदळाचा सरकारी भाव ६ रुपये किलो व गव्हाचा सरकारी भाव ५ रुपये किलो असताना त्याची बेभाव विक्री केली जात आहे. अंत्योदय व बीपीएलधारकांना १३.५0 किलो साखरेचा भाव असताना २२ ते २५ रुपय दराप्रमाणे विकण्यात येत आहे. गावकर्‍यांना धान्याचा सरकारी भाव व प्रतिकार्ड भाव किती आहे, हे माहित नसल्याने गावकरी गप्प होते. मात्र आता गावकर्‍यांचे डोळे उघडले असून देवानंद ठाकरे यांच्या विरोधात गावकर्‍यांनी बंड पुकारले आहे.कार्डधारकांना उद्धट वागणूक देत शिवीगाळ करणे, पैशाचा हिशेब न सांगणे, भाव फलकावर भाव नमूद नसणे, तोंडी भाव विचारल्यास बरोबर भाव न सांगता उडवाउडवीची उत्तरे देऊन परत करणे, अशा अनेक तक्रारी आहेत. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री संजय देवतळे, खासदार हंसराज अहीर व आमदार सुभाष धोटे यांना देण्यात आल्या आहेत. चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य ओमप्रकाश राजुरकर, दादाजी देवतळे, सूर्यभान राजुरकर, साधुजी देवतळे  यांच्यासह गावकर्‍यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)