शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 01:38 IST

विजय वडेट्टीवारांची या मतदार संघातून पहिलीच टर्म असताना गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षातील आमदारांना लाजवेल इतका निधी त्यांनी या मतदार संघासाठी खेचून आणला आहे

राजेश भोजेकरचंद्रपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरे हेवीवेट नेते. ब्रह्मपुरी हा त्यांचा मतदार संघ. या मतदार संघात सत्ताधारी भाजप हा तुल्यबळ पक्ष असला तरी काँग्रेसच्या वडेट्टीवारांना पुरुन उरणारा उमेदवारच नाही. घरातीलच इच्छुकाला पुढे करायचे वा उमेदवार आयात करायचा, यावर भाजपात खलबते सुरू आहे.

विजय वडेट्टीवारांची या मतदार संघातून पहिलीच टर्म असताना गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षातील आमदारांना लाजवेल इतका निधी त्यांनी या मतदार संघासाठी खेचून आणला आहे. गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा धरणात आणून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. तसेच घोडाझरी प्रकल्पातही पाणी आणण्यासाठी शासनाला निधी देण्यास भाग पाडले.

राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची माळ वडेट्टीवारांच्या गळ्यात पडली. या संधीचे सोने करत त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.

येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मात देईल, असा चेहरा भाजपकडे दिसत नाही. माजी आमदार प्रा. अतुल देशकर हे या क्षेत्रात वडेट्टीवारांचे विरोधक म्हणून गेल्या पाच वर्षांत फारसे प्रभाव निर्माण करू शकले नाही. नेमकी हीच बाब हेरुन भाजपचेच वसंत वारजुकर हे देशकरांची तिकीट कापून ते आपल्याला मिळावे, यासाठी वरिष्ठांकडे चकरा मारत आहेत. भाजपची ही अडचण हेरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनीही भाजपकडून तिकिटासाठी आतून प्रयत्न चालविले आहेत. त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचेही त्यांचे समर्थक सांगतात.

श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यात वडेट्टीवारांना शह देणारा चेहरा अद्याप पुढे आलेला नाही, असे चित्र आहे.

पाच वर्षांत काय घडले?वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी नगर परिषदेवर काँग्रेसचा एकहाती झेंडा फडकविला. चंद्रपूरात काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार निवडून आणला. काँग्रेसश्रेष्ठींनीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल केले.गोसेखुर्द, नलेश्वर, आसोलामेंढा व घोडाझरी प्रकल्पाच्या माध्यमातून हे क्षेत्र सुजलाम् सुफलाम् होण्याच्या दिशेने गतीने वाटचाल करीत आहे. सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे सुरू झाले आहे.राज्यात सत्ता असतानाही भाजप या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून कमकुवत दिसत आहे.लोकसभेत लक्षवेधी मते घेणारी वंचित वहुजन आघाडीही अद्याप हालचाली करताना दिसत नाही. विरोधी मतांची फाटाफूट पथ्यावर पडणार का?

गेल्या पाच वर्षांत ब्रह्मपुरी मतदार संघात विकासकामे तर केलीच. शिवाय, मतदार संघातील प्रत्येकाला आपला मुलगा वाटावा, बहिणीला आपला भाऊ वाटावा, एकूणच आपलेच कुटुंब समजून जगलो आहे. काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे विरोधी पक्षाकडे बघताना मला विरोधकच दिसत नाही. - विजय वडेट्टीवार, आमदार, ब्रह्मपुरी मतदारसंघ.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार