शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

मनपात भाजपाला स्पष्ट बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 01:02 IST

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी पार पडली. यात भाजपाचे सर्वाधिक ३६ उमेदवार

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी पार पडली. यात भाजपाचे सर्वाधिक ३६ उमेदवार विजयी झाले असून सत्तेसाठी लागणारा जादुई आकडाही भाजपाने आजच पार केला. मागील पंचवार्षिकच्या तुलनेत काँग्रेस आणखी पिछाडीवर गेला असून काँग्रेसला केवळ १२ जागांवरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच बसपाने आठ जागांवर विजय मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शिवसेना, मनसे, राकाँ यांनी प्रत्येकी दोन जागा घेतल्या तर चार जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. १७ प्रभागातील ६६ जागांसाठी १९ एप्रिलला मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी ५२.५६ होती. पाचही झोन मिळून एक लाख ५८ हजार ७५१ मतदारांनी मतदानात भाग घेतला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांना मतदानासाठी आवाहन करूनही खालावलेली टक्केवारी हा सर्वच पक्षांसाठी चिंतेचा विषय होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरूवातीला संथगतीने झालेल्या मतमोजणीने दुपारनंतर वेग घेतला. निकालाची प्रतीक्षा करीत हजारो कार्यकर्ते भर उन्हात ताटकळत होते. उमेदवारांच्या समर्थकांच्या गर्दीने जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर गजबजून गेला होता. भाजपा आणि काँग्रसेस या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतीष्ठेची बनविली होती. भाजपाकडून प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला आले होते. तर, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली. या सोबतच, भाजपाकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना श्यामकुळे, काँग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया, शिवसेनेकडून आमदार बाळू धानोरकर आदी मंडळी रिंगणात उतरली होती. यामुळे मनपाचा राजकीय आखाडा गजबजून गेला होता. ६६ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवित काँग्रससह सर्वच पक्षांच्या जागा घटविल्या आहेत. भाजपाने प्रारंभीपासूनच आघाडी घेतली होती. ६६ पैकी ३६ उमेदवार निवडून आल्याने भाजपाने सत्ता स्थापनेसाठी होणारा वादविवाद येथेच संपवून टाकला. प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूममध्ये मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेने वर्चस्व स्थापित केले होते. मात्र यावेळी येथून शिवसेनेचा सफाया करीत भाजपाने संपूर्ण प्रभाग काबीज केला आहे. या प्रभागात भाजपाचे सुभाष कासनगोट्टूवार, शिला चव्हाण, अनिल फुलझेले आणि माया उईके हे चारही उमेदवार निवडून आलेत. सुभाष कासनगोट्टूवार यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक बंडू हजारे यांचा तब्बल ३१४५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगरमध्ये भाजपाने तीन तर शिवसेनेने एक जागा मिळविली. येथून भाजपाच्या शितल गुरनुले, वनिता डुकरे, सोपान वायकर व शिवसेनेचे सुरेश पचारे हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक ३ एमईलमधून भाजपाचे तीन तर मनसेचा एक उमेदवार निवडून आला. यात भाजपाचे वंदना जांभूळकर, अंकूश सावसाकडे व चंद्रकला सोयाम आणि मनसेचे सचिन भोयर यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्पमधून भाजपाच्या जयश्री जुमडे, काँग्रेसच्या संगिता भोयर आणि अहमद मन्सूर व अपक्ष उमेदवार अजय सरकार हे विजयी झाले. या प्रभागात भाजपाला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक ५ विवेकनगरमध्ये भाजपाने तीन जागांवर विजय मिळविला. काँग्रेसला येथे एकाच जागेवर समाधान मानावे लागले. येथून भाजापाच्या पुष्पा उराडे, संदीप आवारी व अंजली घोटेकर तर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष सुरेश महाकूळकर हे विजयी झाले. बहुमतांनी विजय दे.गो. तुकूम प्रभागातून भाजपाचे सुभाष कासनगोट्टूवार यांनी ५,२०१ मते घेतली. त्यांचे निकटतम उमेदवार शिवसेनेचे बंडू हजारे यांनी २,०५६ मते घेतली. कासनगोट्टूवार यांनी तब्बल ३,१४५ मतांनी आपला विजयोत्सव साजरा केला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रशांत दानव यांनी विठ्ठल मंदिर प्रभागातून ६,२८८ मते घेऊन भाजपाचे श्रीहरी बनकर (३,७०१) यांच्यावर २ हजार ५८७ मतांनी मात केली. विठ्ठल मंदिर प्रभागातून भाजपाच्या संगिता खांडेकर यांनी ५ हजार २७४ मते घेऊन काँग्रेसच्या अनिता कथडे यांचा तब्बल २ हजार ४१८ मतांनी पराभव केला. महाकाली प्रभागातून कल्पना लहामगे यांनी ४ हजार १३ मते घेत निकटतम उमेदवार भाजपाच्या वनिता कानडे (२३९६) यांचा १ हजार ६१७ मतांनी पराभव केला. या विद्यमानांना घरचा रस्ता या निवडणुकीत मतदारांनी विद्यमान नगरसेवकांना चांगलाच धक्का दिला. मागील पंचवार्षिकमध्ये त्यांना निवडून दिल्यानंतर यावेळी मात्र त्यांना घरचा रस्ता दाखविला. यात काही दिग्गजांचाही समावेश आहे. यात संजय वैद्य, रामू तिवारी, प्रविण पडवेकर, महेंद्र जयस्वाल, बलराम डोडाणी, आकाश साखरकर, सुनिता अग्रवाल, रत्नमाला बावणे, उषा धांडे, योगिता मडावी, बंडू हजारे, विनय जोगेकर, मनोरंजन राय, राजेश अड्डूर, संगिता पेटकुले, करीमलाला काझी, लता साव, राजकुमार उके, शिल्पा आंबेकर, सुषमा नागोसे, अजय खंडेलवाल, धनंजय हुड, अनिता कथडे, दुर्गेश कोडाम, महानंदा वाळके यांचा समावेश आहे.