शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह, लॉनधारकांकडे कोट्यवधी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिली. बºयाच कुटुंबांनी विवाह सोहळा पुढे ढकलले. मात्र, बुकींची रक्कम परत मिळाली नाही तर पुढे काय या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द : विवाह सोहळ्यासाठी पालकांनी केले होते बुकिंग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोव्हेंबर ते जून हा महिना लग्नाचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो पालकांनी आपल्या उपवर मुला-मुलींचे विवाह निश्चित केले. यासाठी सभागृह, कॅटरर व लॉन बुकींग केले. मात्र, जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू झाल्याने कौटुंंबीक व सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्यात आला. त्यामुळे मुला-मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी आगाऊ रक्कम देऊन बुकींग केलेले कोट्यवधी अडकले आहेत.बहुतांश मुलींचे वडील कर्ज काढूनच विवाह लावून देतात. लॉकडाऊनमूळे लग्नकार्य रद्द करावे लागले. सोशल डिस्टन्सिंग पाळून लग्न लावणाऱ्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजण्याऐवढी आहे. मुलींच्या वडिलांनी सभागृह मालक लॉन मालकांना अंशत: किवा पूर्ण बुकींची रक्कम दिली. बऱ्याच कुटुंबांनी विवाह सोहळा पुढे ढकलले. मात्र, बुकींची रक्कम परत मिळाली नाही तर पुढे काय या प्रश्नाने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे कुणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडणे अत्यावश्यक झाले आहे.काहींनी नकार दिल्याने आयुक्तांकडे निवेदनकोरोनाचे संकट साऱ्या जगावरच आहे. यामध्ये कुणीही दोषी नाही. विवाह सोहळा पुढे ढकलेल्या काही कुटुंबांनी सभागृह व लॉनमालकांनी पैसे परत मागितले असताना नकार दिल्याने चंद्रपूर मनपाचे नगरसेवक सचिन भोयर यांच्या उपस्थितीत पालकांनी मनपा आयुक्तांना दिले.२ हजार ६९९ जणांचे क्वारंटाईन पूर्णब्रह्मपरी : रोजगार, शिक्षण व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने परजिल्ह्यात गेलेले तालुक्यातील ३ हजार ३३७ व्यक्ती परजिल्ह्यातून दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ६९९ जणांचा क्वारंटाईन काळ पूर्ण झाला. सध्या ६३८ व्यक्ती अजूनही क्वारंटाईनमध्ये आहेत. ब्रह्मपुरी शहरातील ३४५ व्यक्ती होम क्वारंटाईन पूर्ण झाले तर ११५ होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये. तालुक्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी निश्चित केलेल्या वेळेतच बाजारात जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न