शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती शाळांच्या प्रस्तावात मोठा घोळ

By admin | Updated: July 5, 2014 23:29 IST

शासनाने सीमावर्ती भागासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रात १३ गावांमध्ये माध्यमिक शाळा स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मागितले होते. सुरुवातीपासूनच २० टक्के अनुदानावर शाळा मिळणार असल्याच्या मोहाने

शासनाची फसवणूक : अनेक संस्थांनी जोडले बोगस सातबारागडचांदूर : शासनाने सीमावर्ती भागासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रात १३ गावांमध्ये माध्यमिक शाळा स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मागितले होते. सुरुवातीपासूनच २० टक्के अनुदानावर शाळा मिळणार असल्याच्या मोहाने अनेक संस्थापकांनी प्रस्तावासोबत बनावट कागदपत्रे जोडली आहे. माहितीच्या अधिकारातून सदर माहिती समोर आली आहे.राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे शाळा मिळविण्यासाठी उत्थान एज्युकेशन सोसायटीने तर स्वत:च बोगस सातबारा बनविला. जिवती तालुक्यातील गुडशेला येथील अहिल्याबाई होळकर ग्रामीण बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेला मंडळ अधिकारी व तलाठी यांनी १०० रुपयांच्या मुद्रांकावर साध्या संमतीपत्राच्या आधारे फेरफार घेऊन सातबारा बनवून दिला. सदर सातबाराच्या आधारे या संस्थेला १० गुण प्राप्त झाले आहे. सदर जमीन ही वर्ग २ मधील असून आदिवासींच्या नावे होती. सदर सातबाऱ्यावरून श्यामराव इसरू रायसिडाम यांचे नाव हटविण्याचा प्रताप मंडल अधिकारी व तलाठ्याने केला आहे. त्यामुळे सदर आदिवासी भूमिहीन झाले आहे.आदिवासी कायद्यानुसार शेतजमिनीला धक्कासुद्धा लावता येत नसताना १०० रुपयांच्या मुद्रांकाच्या आधारावर नोटरी करून अहिल्याबाई होळकर ग्रामीण बहुउद्देशिय सेवाभावी संस्था वणी ता. जिवती या संस्थेच्या नावाचा सातबारा तयार केला. शासनाचे मुद्रांक शुल्क सुद्धा या संस्थेने बुडविले असून आदिवासी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे.रवी बहुउद्देशिय शिक्षण व क्रीडा मंडळ पारशिवनी ता. नागपूर या संस्थेच्या नावे परसोडा येथे पितृछाया बहुउद्देशिय शिक्षण संस्था भंडारा या संस्थेच्या वतीने सुपगाव येथे जमीन नसल्याचे लेखी पत्र तलाठ्याने दिले असून संस्थेच्या नावे जमीन असल्याबाबत शासनाकडून १० गुण प्राप्त झाले आहे. जर सदर दोन्ही संस्थेकडे नोंदणीकृत करारनामा किंवा बक्षिसपत्र असते तर शासन निर्णयानुसार आठ गुण प्राप्त झाले असते. मात्र नेमके घडले काय हा घोळ कायम आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रात गुडशेला, पल्लेझरी, लखमापूर, वनसडी, परसोडा, वडगाव, गोविंदपूर, भुरकुंडा, नलफडी, पाचगाव, धोपटाळा, सालेझरी व सुपगाव अशा १३ गावांमध्ये सीमावर्ती माध्यमिक शाळांची स्थापना करण्यात येणार आहे. यापैकी अनेक गावांमध्ये शाळांकरिता विविध संस्थांनी बोगस कागदपत्रे जोडली असून सर्वच संस्थांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)