शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर उसळणार भीमसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:36 IST

येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा रविवारपासून सुरू झाला आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.

ठळक मुद्देधम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे उद्घाटन : आज दिवसभर विविध कार्यक्रम

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा रविवारपासून सुरू झाला आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. रविवारी सायंकाळी या सोहळ्याचे उद्घाटन झाले असून सोमवारी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध भागातून बौद्ध बांधव चंद्रपुरात दाखल झाल्याने येथे भीमसागर पाहायला मिळणार आहे.अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीचा परिसर बुक स्टॉल, कॅसेट्स स्टॉल, लहाण मुलांचे खेळण्याचे दुकान, महामानवाचे फोटो स्टॉल, बाबासाहेबांच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल, सिध्दार्थ गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे बॅच व लॉकेटचे स्टॉल, भोजणालयाचे स्टॉल, स्वागत स्टॉलने चोहोबाजुनी गजबजलेला आहे. दूरवरून येणाºया अनुयायामध्ये एकप्रकारे परिवर्तनाचे विचार दिसत असून त्यांच्या बोलण्यात आनंदोत्सव साजरा होताना दिसत होता. वरोरा नाका चौकात तसेच आजूबाजूला विविध सामाजिक संघटना व विविध राजकिय पक्षाकडून मोठमोठे स्वागताचे बॅनर लागले असून परिसर सजून आहे. शासकीय विभाग, विविध सामाजीक संघटना व राजीकय पक्षाने भोजणाची व्यवस्था केली आहे.तत्काळ आरोग्य सेवा व पोलीस बंदोबस्तदीक्षाभूमीवर येणाºया अनुयायांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खासकरून उड्डाणपुलाखाली पोलीस चौकी लावण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फ त तत्काळ उपचारासाठी महानगर पालीकेकडून रूग्णवाहिका व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेने केली आहे.१६ आॅक्टोबरला चंद्रपूर दीक्षाभूमीवर ऐतिहासिक धम्मक्रांती घडली होती. त्यामुळे विदर्भातून अनेक बौद्ध बांधव डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे जीवनात अमूलाग्र बदल झाला आहे.-वैशाली दुर्योधन, चंद्रपूरआपण चंद्रपूर येथे दरवर्षी येत असतो. वर्षातला एकदा येणारा हा उत्सव असून माझे विचार मला येथे घेऊन येतात.-आत्माराम रामटेके,किरमीरी, गोंडपिपरी.माझ्या दोन दिवसाच्या मजुरीपेक्षा मला डॉ. आंबेडकर यांचे विचार ऐकायचे असतात. यासाठी मी चंद्रपूर येथे आलो आहे.-विशाल दुपारे,धोपटाळा, राजूरा.१९५६ ला ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली, त्याप्रसंगीचा मी साक्षीदार आहे. दरवर्षी मी नागपूरला जात होतो. परंतु आर्थिक अडचण असल्याने यावर्षी चंद्रपूरला आलो.-रामाजी थूलतिगाव, जि.वर्धादरवर्षी मी ठरल्याप्रमाणे नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी जात असतो. डॉ. आंबेडकरांचे विचार माझ्या मनात रूजले असून त्यांच्या विचाराने मला प्रेरणा मिळत असते.-उद्धव नंदेश्वर,पेंढरी, सिंदेवाही .नवनवीन ग्रंथ व पुस्तके उपलब्धदीक्षाभूमी परिसरात नवनवीन ग्रंथ व पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असून जवळपास ५० ते ६० पुस्तकांचे स्टॉल लागले आहेत. पुस्तके व ग्रंथ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत असून नवीन पुस्तके घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. यावर्षी आलेल्या नवीन पुस्तकांत आरक्षण भीक नाही, प्रतिनिधीत्व, ईव्हिएम घोटाळा एक षडयंत्र, रूपया पुढील समस्या, करकरेंना कोणी व का मारले, खरा राष्ट्रपिता कोण ? पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, मुलांसाठी धम्मपद, हिंदू धर्माचे कोडे, तसेच उत्तम कांबळे लिखीत नविन पुस्तके उपलब्ध आहेत.