शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

पर्यटकांना खुणावणारा ‘भिमलकुंड’

By admin | Updated: June 27, 2015 01:29 IST

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील ‘सावलहिरा’ गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ...

जयंत जेनेकर कान्हाळगाव (कोरपना) माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील ‘सावलहिरा’ गावापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा ‘भिमलकुंड’ धबधबा आहे. हा धबधबा आता ओसंडून वाहू लागला असून पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरत आहे. भिमलकुंड धबधब्याचा उपेक्षित स्थळांमध्ये समावेश असला तरी येथील निसर्गरम्य सफारीची अनुभुती काही वेगळीच आहे.येथे जाण्यासाठी कुठलाही पक्का रस्ता नाही की पायवाट नाही. डोंगररांगातील हिरव्याकंच वनराईतून पायदळ वारी करत स्थळ गाठावे लागते. डोंगरदऱ्यांमुळे येथे एखादा व्यक्ती रस्ता सोडून भटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करते. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय दिसतो. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालतो. येथील रानफुल सुगंधाची मुक्त हस्ताने उधळण करीत असतात. निसर्गाच्या या शावरखाली अंघोळ करण्याची मजा वेगळीच ! त्यामुळे अनेकजण या धबधब्याला भेट देतात. सुमारे १५० फुट उंच कडावरून कोसळणाऱ्या पाण्यांमुळे खाली जमिनीवर कुंड तयार झाला. या कुंडाला ‘भिमलकुंड’ म्हणून संबोधले जाते. या कुंडाचे रूप हे भीमासारखे भासत असल्यानेच याचे नाव ‘भिमलकुंड’ पडले असावे. मात्र येथील कडा उतरणे व चढणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या धबधब्याचा पर्यटनाचा दृष्टीने विकास होणे आवश्यक आहे. येथे जाण्यासाठी मुख्य अडचण रस्त्याची असल्याने महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याठिकाणी सहज येता येत नाही. या डोंगरावर विविध वनऔषधी वनस्पती असल्याचे दिसून येते. येथील रस्त्याच्या कडेला आवळ्याच्या रांगा आहे. या धबधब्यालगतच्या परिसरात भस्म नागाची खोरी, रोहिणीमुंडा, जांभूळधराची झिरणे, बोदबोधी आदी पर्यटनस्थळेही आहेत.येथे कसे पोहचाल?भिमलकुंड धबधबा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहे. एक मार्ग सावलहिरा आणि दुसरा टांगाळा. यातील सावलहिरावरून जाताना येल्लापूर रस्त्यावर पहाडी आहे. तिथून गोल घुमटांच्या दिशेने रस्त्यावरच दुचाकी ठेऊन पायदळ वारी करीत डोंगरमाथातून स्थळापर्यंत पोहचता येते. टांगाळा येथून नाल्या-नाल्याने सरळ दिशेने वर चढत जावे लागते. दोन्ही मार्गाने वाहनांने जाता येत नाही. ही वाहने लाल पहाडी किंवा टांगाळा येथेच ठेऊन पायदळ मार्गक्रमण करावे लागते.पर्यटनदृष्ट्या व्हावा विकासमाणिकगड पहाडालगत वसलेल्या कोरपना व जिवती तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहे. मात्र ती उपेक्षित असून शासन दरबारी साधी नोंदसुद्धा नाही. या स्थळांवर लक्ष केंद्रीत करून विकास आराखडा तयार करावा. तालुक्यातील पकडीगुड्म, अमलनाला धरण, चौपाटी गुफा, काराई गोराई, कपिलाई भुयार, बानकदेवी आदी स्थळांचा पर्यटन विकास करावा.