शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

भद्रावती पं.स.कार्यालय रामभरोसे

By admin | Updated: October 15, 2016 00:51 IST

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून सुरू केले.

विनायक येसेकर भद्रावतीएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून सुरू केले. तसेच नशामुक्तीसाठी राज्यात गुटखा बंदी आणि या जिल्ह्यात दारुबंदी राबवून एक सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा जनप्रतिनिधींनी वसा घेतला आहे. मात्र शासनाच्या या योजनेला शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे हरताळ फासण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता लोकमतने केलेल्या स्ट्रिंग आॅपरेशनवरुन दिसून आले.भद्रावती पंचायत समितीचे वेगवेगळे विभाग एक छत्रछायेखाली नाहीत. त्यामुळे याठिकाणी कार्यालयीन कामासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभाग शोधणे कठीण जाते. त्यात कुणी एखादा विभाग कुठे आहे? अशी विचारणा केल्यास त्याला बरोबर उत्तर मिळत नाही. तसेच संबंधित विभागाचे प्रमुख हे मनमानी कारभार करीत असल्याचे लोकमत स्टिंग आॅपरेशन मधून समोर आले. कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजरच नाही. काही अधिकारी आणि कर्मचारी चक्क या कार्यालयीन वेळा चहाच्या टपरीवर गप्पा मारताना दिसले. पंचायत समिती सभापती, उपसभापती, संवर्ग विकास अधिकारी कार्यालत उपस्थित नव्हते. पंचायत समितीच्या परिसरात अस्वच्छतेचा कळस होता. पिण्याच्या पाण्याच्या जागी पान खर्ऱ्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. कनिष्ठ कर्मचारी आपल्यासाठी आणि साहेबांसाठी कार्यालयात बिनधास्त तंबाखू घोटत असल्याचे आढळले. यावर त्याला विचारणा केली असता तुमी आमचे साहेब होत का? विचाराले असा खोचक प्रश्न त्याने केला. त्यातच आजूबाजूला वाढलेला कचऱ्यामुळे हा संपूर्ण परिसर अस्वच्छ दिसतो.सभापती निवास की, दारुचा अड्डापंचायत समितीला लागूनच सभापती निवास आहे. या निवासात सभापती गेल्या अडीच वर्षांपासून राहतच नाही. येथे कृषी विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर इतर विभागातील काही अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरील व्यक्ती या ठिकाणी बसून ओली पार्टी झोडीत असतात. सभापती निवासात असलेल्या एका टाक्यात दारुच्या खाली बाटल्यांनी खचाखच भरलेल्या ढिगावरुन दिसून आले. तसेच या टाक्यात मिनरल वॉटर बॉटल, पाणी पाऊचचे रिकामे पॉकेट खचाखच भरुन आहेत. तसेच कार्यालयाच्या मागील भागातसुद्धा रिकाम्या दारुच्या बाटल्या आढळल्या. चंद्रपूर जिल्हा दारुबंदी असताना आणि १०० टक्के दारुबंदीसाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करीत असताना, हा प्रकार शासकीय प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घडत असेल. तर दारुबंदी किती यशस्वी झाली, हे ‘लोकमत’च्या स्ट्रिंग आॅपरेशनवरुन दिसून येते. याबाबत आमच्या वार्ताहरांने आपल्या भ्रमणध्वनीवरुन संवर्ग विकास अधिकारी तुपे यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी संपर्क साधण्याचे टाळले.कारवाईची मागणी अन्यथा आंदोलनआपण पंचायत समितीच्या या भोंगळ कारभाराबाबत वेळोवेळी वरिष्ठांना माहिती दिली. परंतु त्यात त्यांनी कुठल्याच प्रकारची सुधारणा केली नाही. यावरुन त्यांचेसुद्धा या कामात सहकार्य असावे अशी शंका येते. लोकमतने केलेल्या या स्ट्रिंग आॅपरेशनने आता तरी ही बाब समाजासमोर आली आहे. लोकमतचे हे कार्य स्तुत्य आहे. तरीही बदल झाला नाही तर आंदोलन उभारु, असा इशारा भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गेनवार यांनी दिला.जि.प. सदस्य विजय वानखेडेपंचायत समिती कार्यालयात सुरू असलेल्या हा प्रकार निंदनीय आहे. जिल्हा दारूबंदी असताना सभापती निवासातील कृषी विभागात तसेच परिसरात आढळलेल्या दारूच्या रिकाम्या बाटला हे त्याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या निढविलेल्या वृत्तीचे घ्रोतक आहे. यात बदल व्हावा याकरीत आपण मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटू असे विजय वानखेडे यांनी सांगितले.