शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ध्वनी प्रदूषण कराल तर खबरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:17 IST

आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा होईल, यावर सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी भर दिला पाहीजे.

ठळक मुद्देगणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा होईल, यावर सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी भर दिला पाहीजे. ध्वनीप्रदूषणच्या बाबतीत उच्च न्यायालयाने सुद्धा निरीक्षक नेमलेले असून ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आहेत. या कायद्यानुसार जो कोणी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करेल, त्याला पाच वर्ष शिक्षा किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.आगामी गणेशोत्सवाच्या निमित्त्याने चंद्रपूर पोलीस मुख्यालयात जिल्हा शांतता समिती तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांची संयुक्त बैठक ड्रिल शेड पोलीस मुख्यालय येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.बैठकीला महापौर अंजली घोटेकर, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, धर्मदाय उपआयुक्त तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य, जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.गणेश सभामंडपाच्या रोषणाईकरिता लावण्यात आलेल्या इलेक्ट्रीक वायरची जुळणी ही अतीशय थातूरमातूर स्वरूपात केलेली असते. इलेक्ट्रीक वायरची जुळणी अपघात होऊ नये, या दृष्टीणे योग्यप्रकारे करुन घ्यावी तसेच आयएसआय मार्क असलेले विद्युत उपकरणे वापरण्यास व शहरातील सिव्हील इलेक्ट्रीकल लाईनला स्पर्श होणार नाही, यादृष्टीने १५ फूटापेक्षा जास्त उंचीची गणेशमूर्ती किंवा मूर्ती विसर्जनाची सजावट नसावी, याबाबतही सर्व गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.सर्व गणेश मंडळांना उत्सवा दरम्यान मंगलमय भक्तीपर गीते लावण्याचे, तसेच पीओपी मूर्ती न वापरता इको फ्रेन्डली मूर्ती वापरुन जलचर प्राण्याचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जन मार्गावर एकूण ३५ रुग्णालय आहेत. त्यामध्ये आपलेच कोणीतरी बांधव उपचार घेत असल्याची जाणीव ठेवून गणेश मिरवणूकीचा त्रास रुग्णांना होणार नाही, याची दक्षता प्रत्येक गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक ठाकर यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हाभरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंडळाची नोंदणी व खर्चाचा ताळमेळ सादर करणे आवश्यकबैठकीत माहिती देताना धर्मदाय आयुक्त यांनी सर्व गणेश मंडळाची नोंदणी असणे आवश्यक असून पदाधिकाºयांच्या सोयीसाठी शासनाने संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. त्यावर जाऊन मंडळानी गणपती मंडळाची नोंदणी करणे आवश्यक असून या वर्षी नोंदणी करतेवेळेस मंडळातील सदस्यांचे पॅन कार्ड नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळाची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून तपासणी केली जाणार असून मंडळाच्या दस्तऐवजाची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. यामध्ये जे कोणतेही मंडळ परवानगी न घेतल्याचे आढळून आल्यास तसेच दस्ताऐवजामध्ये कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास त्या मंडळावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. उत्सवा दरम्यान मंडळाची वर्गणी व करण्यात आलेला खर्च याबाबत अकाऊंट स्टेटमेन्ट अद्यावत असणे आवश्यक असून ते धर्मदाय आयुक्त येथे जमा करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.वर्गणी मागताना जबरदस्ती नकोवर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती व्हायला नको, याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी. वर्गणीबाबत कोणत्याही प्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याचप्रमाणे विसर्जनामध्ये एका मंडळाकडे तीन पेक्षा जास्त वाहनाची परवाणगी देण्यात येणार नाही. नियमांमध्ये व कायद्याच्या अमंलबजावणीमध्ये कोणताही भेदभाव मंडळाची प्रतिष्ठा पाहून केल्या जाणार नाही. प्रत्येक लहान मोठ्या गणेश मंडळानी कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे व सामाजिक स्वास्थ्याचे उल्लंघन होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी, असे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी बैठकीत सांगितले.