शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोयाबीनने दिला दगा; आता शेतकऱ्यांची कापसावरच भिस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:37 IST

Chandrapur : खासगी बाजारपेठेत मिळतोय तोकडा दर

प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्या तुलनेत सोयाबीनचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने कापसाची दरवाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र अपेक्षेप्रमाणे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. उलट खासगी बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत अल्प दर मिळाल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडले नाही. सोयाबीन सोबतच शेतकरी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना सात हजार रुपये एवढ्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही.

कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची आज वाईट अवस्था झाली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीला दिवसेंदिवस अवकळा आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके कापसाच्या उत्पादनात अग्रेसर मानले जातात. मात्र दिवसेंदिवस कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने आता नावालाच असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे. खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये तोकडा दर मिळत असल्याने या कापसाच्या दरात शेतकऱ्यांनी कापसावर केलेला उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. मात्र शासन शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. उत्पादनापेक्षा खर्च महाग झाल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीत कापूस विकायला परवडत नाही. परंतु नाईलाजाने शेतकऱ्यांना सात हजार एवढ्या कवडीमोल भावात कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. मात्र याकडे अजूनही शासनाने लक्ष देऊ नये हे एक कोडेच आहे.

"शेतकरी दरवर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये एवढा तोकडा दर मिळत असल्याने कापूस कमी दरात विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शासनाने कापसाच्या दरात वाढ करावी." - श्रीधर जुनघरी, कापूस उत्पादक शेतकरी, गोवरी

"कापूस पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला तोकडा दर असल्याने कमी भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. कापूस वेचणीचे दर वाढल्याने कापसाची दरवाढ होणे अपेक्षित आहे." - चेतन बोभाटे, युवा शेतकरी

कापूस वेचणीची मजुरी महागली कापूस तोकड्या दरात शेतकऱ्यांना विकावा लागत असला तरी ८ ते ९ रुपये किलोप्रमाणे बाहेरील मजूर आणून कापूस वेचणी करावी लागत आहे. सध्या सर्वांकडे कापूस वेचणीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांना कापूस वेचणी करण्यासाठी मजुरांच्या शोधत फिरावे लागत आहे. वेचणीचा खर्च महाग झाल्याने तसेच कापसाला बाजारपेठेत चांगला दर नसल्याने कापूस पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीSoybeanसोयाबीनAgriculture Sectorशेती क्षेत्र