शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

सोयाबीनने दिला दगा; आता शेतकऱ्यांची कापसावरच भिस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:37 IST

Chandrapur : खासगी बाजारपेठेत मिळतोय तोकडा दर

प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्या तुलनेत सोयाबीनचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने कापसाची दरवाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र अपेक्षेप्रमाणे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. उलट खासगी बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत अल्प दर मिळाल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडले नाही. सोयाबीन सोबतच शेतकरी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना सात हजार रुपये एवढ्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही.

कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची आज वाईट अवस्था झाली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीला दिवसेंदिवस अवकळा आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके कापसाच्या उत्पादनात अग्रेसर मानले जातात. मात्र दिवसेंदिवस कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने आता नावालाच असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे. खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये तोकडा दर मिळत असल्याने या कापसाच्या दरात शेतकऱ्यांनी कापसावर केलेला उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. मात्र शासन शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. उत्पादनापेक्षा खर्च महाग झाल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीत कापूस विकायला परवडत नाही. परंतु नाईलाजाने शेतकऱ्यांना सात हजार एवढ्या कवडीमोल भावात कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. मात्र याकडे अजूनही शासनाने लक्ष देऊ नये हे एक कोडेच आहे.

"शेतकरी दरवर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये एवढा तोकडा दर मिळत असल्याने कापूस कमी दरात विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शासनाने कापसाच्या दरात वाढ करावी." - श्रीधर जुनघरी, कापूस उत्पादक शेतकरी, गोवरी

"कापूस पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला तोकडा दर असल्याने कमी भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. कापूस वेचणीचे दर वाढल्याने कापसाची दरवाढ होणे अपेक्षित आहे." - चेतन बोभाटे, युवा शेतकरी

कापूस वेचणीची मजुरी महागली कापूस तोकड्या दरात शेतकऱ्यांना विकावा लागत असला तरी ८ ते ९ रुपये किलोप्रमाणे बाहेरील मजूर आणून कापूस वेचणी करावी लागत आहे. सध्या सर्वांकडे कापूस वेचणीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांना कापूस वेचणी करण्यासाठी मजुरांच्या शोधत फिरावे लागत आहे. वेचणीचा खर्च महाग झाल्याने तसेच कापसाला बाजारपेठेत चांगला दर नसल्याने कापूस पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीSoybeanसोयाबीनAgriculture Sectorशेती क्षेत्र