शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेल्लोराच्या नागरिकांची जिल्हा परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:38 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोध दर्शवत भद्रावती तालुक्यातील बेल्लोरा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आमच्या गावची शाळा बंद करू नका, अन्यथा एकाही विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत पाठविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.बेल्लोरा ...

ठळक मुद्देशाळा बंद करू नका : विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विरोध दर्शवत भद्रावती तालुक्यातील बेल्लोरा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. आमच्या गावची शाळा बंद करू नका, अन्यथा एकाही विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत पाठविणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.बेल्लोरा जिल्हा परिषद शाळेत १ ते चवथीपर्यंत दहा विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र कमी पटसंख्येमुळे ही शाळा बंद करण्यात आली असून येथील विद्यार्थ्यांचे अडीच ते तीन किमी अंतरावरील जेना येथील जिल्हा परिषद शाळेत समायोजन करण्यात आले आहे. लहान बालकांना अडीच ते तीन किमी अंतर जावून शिक्षण घेणे अवघड असल्याने गावची शाळा सुरू ठेवावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीची आहे.जिल्हा परिषदेवर धडक दिली तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हजर नव्हते. तेव्हा पदाधिकाऱ्यांनी कृषी सभापती अर्चना जिवतोडे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर कायरकर, प्रतीभा पंडीले, पोलीस पाटील उषा पंडीले, प्रशांत मत्ते, गुणवंत मत्ते, वर्षा पंडीले, विकास पंडीले, स्वप्नील पंडीले, रेखा मत्ते, कल्पना आस्कर, विद्यार्थिंनी श्रावणी कायरकर, ममता कायरकर, वैष्णवी मत्ते आदी उपस्थित होते.