शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

झरपट नदीपात्राच्या खोलीकरणाला सुरूवात

By admin | Updated: March 21, 2017 00:37 IST

महाकाली यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिकेकडून यात्रेची जय्यत तयारी चालली असून

यात्रेची जय्यत तयारी : हंसराज अहीर यांच्याकडून कामाची पाहणीचंद्रपूर : महाकाली यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिकेकडून यात्रेची जय्यत तयारी चालली असून भाविकांना सोईसुविधा पुरविण्यासाठी नियोजन सुरू आहे. भाविकांना पवित्र स्नान करता यावे यासाठी झरपट नदीची स्वच्छता केली जात असून नदी पात्र खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. रविवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कामाची पाहणी केली. झरपट नदीची होत असलेली दुरवस्था व स्वच्छतेबाबत झालेले दुर्लक्ष व नदीतील दूषित पाणी, नदीपात्रात इकोर्निया वनस्पती वाढत आहे. नदीच्या स्वच्छतेबाबत मागील अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असून महानगरपालिकेच्या माध्यमातून नदीच्या स्वच्छतेचे कार्य ना. अहीर यांच्या पुढाकारातून सुरू झाले आहे. ना. अहीर यांनी झरपट नदीच्या खोलीकरणाकरिता धारीवाल इंन्फ्रास्ट्रक्चवर प्रा. लि. ताडाळी या कंपनीला सामाजिक दायित्व स्वीकारून झरपट नदीचे खोलीकरण करण्यास योगदान द्यावे, असे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार धारीवाल इंन्फ्रास्ट्रक्चरने झरपट नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. ना. अहीर यांनी रविवारी प्रत्यक्ष मोक्यावर जावून या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, जिल्हा महामंत्री राजेश मून, जिल्हा सचिव राहुल सराफ, नगरसेवक धनंजय हुड, माजी नगरसेवक शंकर वाकोडे, धारीवाल इंन्फ्रास्टक्चवर लिमि.चे बसाब घोष, संदीप मुखर्जी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवाने, महानगरपालिकेचे अभियंता अनिल घुमडे, महेश बारई, मोहन चौधरी, राजू घरोटे, तेजा सिंह, श्याम कनकम, अशोक सोनी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश भेटीदरम्यान ना. अहीर यांनी मनपाचे अधिकारी, पाटबंधारे विभाग, धारीवालचे बसाव घोष यांना कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या व काम जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. नदीच्या खोलीकरणानंतर सौंदर्यीकरणासाठी निधीची उपलब्धता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असलेल्या या नदीचे सौंदर्य अबाधित राहिले पाहिजे, असेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.