चिमूर : भारतीय बौद्ध महासभा तालुका चिमूर अंतर्गत ग्रामशाखा नेरीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून महाड क्रांती दिवस कार्यक्रम नेरी येथील दिक्षाभूमीमध्ये झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.संजीवनी सातारडे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागभीडचे श्याम रामटेके तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जयदिप खोब्रागडे, बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे, लोमेश खोब्रागडे, भानुदास पोपटे, प्रल्हाद लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्याम रामटेके यांनी महाराजांचा अर्थात बौद्धांच्या शौर्याचा इतिहास सांगितला. हे लोक लढवय्ये व पराक्रमी होते. इतिहासाच्या खोलवर गेले. या जमातीने नेहमी सन्मानासाठी संघर्ष करुन माणसाचे जिवन प्राप्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीची खरी सुरुवात महाडच्या चवदार तळ्याचे पाणी या संग्रामपासून झाली आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले. समाजाने सावधान राहण्याची गरज आहे.सावधान राखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी शस्त्र दिले. ते शस्त्र म्हणजे मातृसंस्था, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व पक्ष नावाची संघटना या चाकोरीतून राहून समाजाने कार्य केले पाहिजे. समता सैनिक दल मजबूत करुन गाव तिथे सैनिक निर्माण झाला पाहिजे. देशात जातीभेद, समाजभेद, भ्रष्टाचार, विषमतावाद, जातीय दंगली निर्माण करण्याचे कार्य जोरात सुरु आहे. त्याला उत्तर म्हणजे सामाजिक एकता हेच आहे. तेव्हा समाजाने डॉ. आंबेडकरांची प्रेरणा घेवून महाडच्या क्रांती दिनाची आठवण ठेवली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. आर. कांबळे यांनी केले. संचालन शिवराम मेश्राम व किर्तीशिल ढवळे यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद लाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विलास राऊत, शालिनी डांगे, मिलिंद जांभूळकर, सरिता जनबंधू, शितल पाटील, सोनल डांगे, सुनिल घोनमोडे, मिलिंद कऱ्हाडे, शिला अंबादे, विद्यानंद इंदोरकर, शालिनी साखरे, संजय नागदेवते, निर्दोष पाटील, नितीन इंदोरकर यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
बौद्धांच्या क्रांतीची सुरुवात चवदार तळ्यापासून - श्याम रामटेके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 01:34 IST