शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्वत:च तयार करू लागले स्वत:साठी अपारंपरिक इंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग यांनी स्वतःचे इंधन स्वत:च तयार करण्याचे धाडस दाखविले. परिणामी, एका वाहनामागचा दररोजचा सुमारे १० ते १२ हजारांचा खर्चही वाचविण्यात त्यांना यश आले.

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बायोडिझेल हा जैवइंधनाचा दुसरा प्रकार आहे. पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग यांनी स्वतःचे इंधन स्वत:च तयार करण्याचे धाडस दाखविले. परिणामी, एका वाहनामागचा दररोजचा सुमारे १० ते १२ हजारांचा खर्चही वाचविण्यात त्यांना यश आले. सध्या हे अपारंपरिक जैवइंधन इतरांना न विकता स्वत:साठीच वापर करीत आहेत.जैव इंधन हे अक्षय ऊर्जास्रोत मानले जाते, अशी माहिती देऊन राणा सिंग म्हणाले, आमचा डीएनआर नावाचा वाहतूक व्यवसाय आहे. दररोज शेकडो लिटर डिझेल लागतो. यातून खर्च तरच वाढतच होता दुसरीकडे पर्यावरणाचीही हाणी होत असल्याचे लक्षात आले. वनस्पती पदार्थांच्या बायोमासपासून इंधर तयार होते. हे लक्षात आल्यानंतर ताडाळी येथे २०१९-२० मध्ये दशमेश बायो इनर्जी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी कच्चा माल औरंगाबाद, हैदराबाद व अन्य शहरातून आयात करतो.

एकमेव पर्यावरणपूरक प्रकल्पताडाली येथील प्रकल्पाची दरदिवशी २४ हजार लिटर बायोडिझल उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या दररोज सुमारे ३ ते ४ हजार लिटर उत्पादन घेतले जात आहे. सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. हा नैसर्गिक व अपारंपरिक असा ऊर्जास्रोत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जैवइंधनाचा हा एकमेव प्रकल्प आहे. सरकारने बायोडिझेल वापरण्यासाठी २५ टक्के अट ठेवली. सरकारच्या सर्व निकषांत हा प्रकल्प यशस्वी ठरला, अशी माहिती राणा सिंग यांनी दिली.

ऑक्सिजनयुक्त इंधन  डिझेल इंधनासारच्या वैशिष्ट्यांमुळे बायोडिझेल उच्च कार्यक्षमता डिझेल इंजिनमध्ये वापरली जाते. या इंधनात पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन नसतात. जोखमीशिवाय साठवून ठेवता येते. हे एक नूतनीकरणयोग्य़़, बायोडिग्रेडेबल ऊर्जास्रोत आहे. बायोडिझेलमध्ये उत्कृष्ट गुणधर्म आणि ऑक्सिजनयुक्त इंधन आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील हा नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. नैसर्गिक व अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून इंधन मिळविता येते. इतरांनाही यापासून बोध घ्यावा. व्यवसाय करताना आम्ही पर्यावरणाचा विचार करून हा प्रकल्प उभारला. प्रकल्प सध्या उत्तमरित्या सुरू आहे. नवीन वर्षात पूर्ण क्षमतेने उत्पादन करण्याचा संकल्प आहे. -राणा सिंग, उद्योजक जैवइंधन, चंद्रपूर

 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढ