शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

५० हजार हेक्टरवर कापूस, सोयाबीनची ‘बेडवर लागवड’ ; शेतकऱ्यांचा नव्या यशाचा फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:05 IST

वरोरा कृषी विभागाचे नियोजन : शेतकरी लागले कामाला

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : खरीप हंगामाला सुरुवात होताच कापूससोयाबीन पिकाची सरी वरंभा पद्धतीने बेडवर लागवड करण्याकरिता वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेड तयार करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा आठ हजार ते १० हजार हेक्टरवर बेड लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जवळपास ५० हजार हेक्टरवर बेड पद्धतीने कापूससोयाबीनची लागवड होणार आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने नियोजन सुरू केला आहे.

चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार व मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी मागील वर्षी बेडवर लागवड करण्याकरिता सोयाबीनची अष्टसूत्री विषयावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणावर भर दिला. वरोरा तालुक्यातील चिनोरा, शेगाव बु, राळेगाव आदी परिसरात शेतकरी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊन ४० हजार हेक्टरवर कापूस व सोयाबीनची बेडवर लागवड केली. अतिवृष्टी होऊनही पिके बुरशी रोगापासून रोगमुक्त राहिली व सरासरी उत्पन्नामध्ये वाढ झाली. यावर्षी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मागील वर्षाचे अनुभव लक्षात घेता परिसरामध्ये सर्वत्र बेड तयार करण्याची मोहीमच हाती घेतली. 

वरोरा कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, घनश्याम पाटील व उपकृषी अधिकारी प्रफुल्ल आडकिने, गजानन सवंडकर, लता दुर्गे यांनी विशेष प्रयत्न केले व शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन बेड तयार करण्याच्या पद्धती समजून सांगितल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर आवश्यक पाऊस पडताच बेडवर कापूस व सोयाबीन लागवडीसाठी तयार आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. 

कृषिमंत्र्याने घेतली होती दखलमागील वर्षी वरोरा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्याही परिस्थितीमध्ये तालुक्यातील ४० हजार हेक्टरवरील कापूस व सोयाबीन पिके वाचवण्यात तालुका कृषी विभागाला यश प्राप्त झाले होते. ही बातमी 'लोकमत' वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली होती. 

"वरोरा तालुक्याचे वार्षिक प्रजन्यमान ११०० ते १३०० मिमी असल्याने अतिवृष्टीमध्ये पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. बिबी एफ व बेडवर लागवड करून नुकसान टाळता येते हे प्रशिक्षण व मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. मागील वर्षीच्या चांगला अनुभवाने यंदा पेरा वाढला."- विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगांव

"मागील वर्षी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बेडवर टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यामुळे ऑगस्ट महिन्यात दोनवेळा अतिवृष्टी होऊनसुद्धा पिकाची वाढ चांगली होऊन सरासरी उत्पादनात ३ ते ४ क्विंटलने वाढ दिसून आली."- प्रमोद कुंभारे, शेतकरी, अर्जुनी 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीcottonकापूसSoybeanसोयाबीन