शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार हेक्टरवर कापूस, सोयाबीनची ‘बेडवर लागवड’ ; शेतकऱ्यांचा नव्या यशाचा फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:05 IST

वरोरा कृषी विभागाचे नियोजन : शेतकरी लागले कामाला

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : खरीप हंगामाला सुरुवात होताच कापूससोयाबीन पिकाची सरी वरंभा पद्धतीने बेडवर लागवड करण्याकरिता वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेड तयार करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा आठ हजार ते १० हजार हेक्टरवर बेड लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जवळपास ५० हजार हेक्टरवर बेड पद्धतीने कापूससोयाबीनची लागवड होणार आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने नियोजन सुरू केला आहे.

चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार व मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी मागील वर्षी बेडवर लागवड करण्याकरिता सोयाबीनची अष्टसूत्री विषयावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणावर भर दिला. वरोरा तालुक्यातील चिनोरा, शेगाव बु, राळेगाव आदी परिसरात शेतकरी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊन ४० हजार हेक्टरवर कापूस व सोयाबीनची बेडवर लागवड केली. अतिवृष्टी होऊनही पिके बुरशी रोगापासून रोगमुक्त राहिली व सरासरी उत्पन्नामध्ये वाढ झाली. यावर्षी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मागील वर्षाचे अनुभव लक्षात घेता परिसरामध्ये सर्वत्र बेड तयार करण्याची मोहीमच हाती घेतली. 

वरोरा कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, घनश्याम पाटील व उपकृषी अधिकारी प्रफुल्ल आडकिने, गजानन सवंडकर, लता दुर्गे यांनी विशेष प्रयत्न केले व शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन बेड तयार करण्याच्या पद्धती समजून सांगितल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर आवश्यक पाऊस पडताच बेडवर कापूस व सोयाबीन लागवडीसाठी तयार आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. 

कृषिमंत्र्याने घेतली होती दखलमागील वर्षी वरोरा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्याही परिस्थितीमध्ये तालुक्यातील ४० हजार हेक्टरवरील कापूस व सोयाबीन पिके वाचवण्यात तालुका कृषी विभागाला यश प्राप्त झाले होते. ही बातमी 'लोकमत' वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली होती. 

"वरोरा तालुक्याचे वार्षिक प्रजन्यमान ११०० ते १३०० मिमी असल्याने अतिवृष्टीमध्ये पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. बिबी एफ व बेडवर लागवड करून नुकसान टाळता येते हे प्रशिक्षण व मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. मागील वर्षीच्या चांगला अनुभवाने यंदा पेरा वाढला."- विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगांव

"मागील वर्षी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बेडवर टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यामुळे ऑगस्ट महिन्यात दोनवेळा अतिवृष्टी होऊनसुद्धा पिकाची वाढ चांगली होऊन सरासरी उत्पादनात ३ ते ४ क्विंटलने वाढ दिसून आली."- प्रमोद कुंभारे, शेतकरी, अर्जुनी 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीcottonकापूसSoybeanसोयाबीन