शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

पाऊस पडताना वीज उपकरणांपासून राहा सावधान ! अपघात टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:34 IST

Nagpur : सध्या पावसाचे दिवस असून धोका टाळण्यासाठी प्रत्येकांनी सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाळ्याचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनीही स्वतःच्या स्तरावर वीज उपकरणांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, वीज खांबाजवळ जाणे, स्पर्श करणे टाळले पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये वीज खांबाना बैल बांधले जाते, ते टाळले पाहिजे. 

अडचण आल्यास संपर्क साधा :विजेसंबंधित कोणत्याही समस्यांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १८००२३३३४३५, १८००२१२३४३५ आणि १९१२ या टोल-फ्री क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसोबतच वीज अपघात आणि वीजबिलांसंबंधी तक्रारी देखील नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे. 

घरात सुरक्षित राहाओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. विद्युत उपकरणांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्या. उपयोग नसताना विद्युत उपकरणांचे प्लग बोर्डातून काढून ठेवा. घरातील अर्थिगची नियमित तपासणी करा. ज्यांचे घर फयाचे आहे, त्यांनी पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंगची तपासणी करून घ्यावी, विजा कडकडत असताना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी विद्युत उपकरणे वापरणे टाळा. प्लग काढून ठेवणे सुरक्षेसाठी योग्य आहे.

घराबाहेर अशी घ्या काळजीपावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा, वीज रोहित्र किंवा खांबाजवळ खड्डा असल्यास आणि त्यात पाणी साचले असल्यास त्यापासून दूर राहा. घराजवळ वीज तारा लोंबकळत असल्यास त्याची माहिती तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना द्या. घराशेजारी वीज तारा गेल्या असल्यास स्पर्श करू नका.

महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू : नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • पावसाळ्यापूर्वी आपल्या परिसरातील वीज खांब, तारा, रोहित्र किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणांत काही बिघाड आढळल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी त्वरित आपल्या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
  • वीज खांबांना स्पर्श करणे टाळा आणि पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंग व अर्थिग तपासून संभाव्य धोका टाळा. अनेकदा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास काही नागरिक त्वरित वीज सुरू करण्याच्या प्रयत्नात अकुशल वायरमनची मदत घेतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे, अधिकृत तंत्रज्ञांचीच मदत घ्यावी, पावसाच्या दिवसामध्ये वीज खांबापासून दूर राहण्याचे तसेच घरातील अर्थिग तपासण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर