शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

पाऊस पडताना वीज उपकरणांपासून राहा सावधान ! अपघात टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:34 IST

Nagpur : सध्या पावसाचे दिवस असून धोका टाळण्यासाठी प्रत्येकांनी सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाळ्याचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनीही स्वतःच्या स्तरावर वीज उपकरणांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, वीज खांबाजवळ जाणे, स्पर्श करणे टाळले पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये वीज खांबाना बैल बांधले जाते, ते टाळले पाहिजे. 

अडचण आल्यास संपर्क साधा :विजेसंबंधित कोणत्याही समस्यांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १८००२३३३४३५, १८००२१२३४३५ आणि १९१२ या टोल-फ्री क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसोबतच वीज अपघात आणि वीजबिलांसंबंधी तक्रारी देखील नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे. 

घरात सुरक्षित राहाओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. विद्युत उपकरणांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्या. उपयोग नसताना विद्युत उपकरणांचे प्लग बोर्डातून काढून ठेवा. घरातील अर्थिगची नियमित तपासणी करा. ज्यांचे घर फयाचे आहे, त्यांनी पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंगची तपासणी करून घ्यावी, विजा कडकडत असताना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी विद्युत उपकरणे वापरणे टाळा. प्लग काढून ठेवणे सुरक्षेसाठी योग्य आहे.

घराबाहेर अशी घ्या काळजीपावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा, वीज रोहित्र किंवा खांबाजवळ खड्डा असल्यास आणि त्यात पाणी साचले असल्यास त्यापासून दूर राहा. घराजवळ वीज तारा लोंबकळत असल्यास त्याची माहिती तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना द्या. घराशेजारी वीज तारा गेल्या असल्यास स्पर्श करू नका.

महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू : नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • पावसाळ्यापूर्वी आपल्या परिसरातील वीज खांब, तारा, रोहित्र किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणांत काही बिघाड आढळल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी त्वरित आपल्या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
  • वीज खांबांना स्पर्श करणे टाळा आणि पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंग व अर्थिग तपासून संभाव्य धोका टाळा. अनेकदा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास काही नागरिक त्वरित वीज सुरू करण्याच्या प्रयत्नात अकुशल वायरमनची मदत घेतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे, अधिकृत तंत्रज्ञांचीच मदत घ्यावी, पावसाच्या दिवसामध्ये वीज खांबापासून दूर राहण्याचे तसेच घरातील अर्थिग तपासण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर