शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अन्न भेसळीबाबत जागरूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:37 IST

जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ हा समाजापुढील गहन प्रश्न झाला आहे. याबाबतची वास्तविकता व जागरुकता शालेय स्तरावरून मुलांमध्ये रुजविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. अन्न व औषध प्रशासनाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी पार पडली.यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ हा समाजापुढील गहन प्रश्न झाला आहे. याबाबतची वास्तविकता व जागरुकता शालेय स्तरावरून मुलांमध्ये रुजविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. अन्न व औषध प्रशासनाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी पार पडली.यावेळी ते बोलत होते.समाज जोपर्यंत प्रशासनाचे नाक, कान, डोळे होत नाही. तोपर्यंत असामाजिक तत्त्वाद्वारे समाज विघातक कार्यवाही कमी होणार नाही. दुधामध्ये भेसळ, अन्नधान्यमधली भेसळ, मिठाई, खाद्यान्न यामध्ये भेसळ करणारे आपली मुले देखील या भेसळीचे शिकार होऊ शकतात, हे विसरतात. त्यामुळे अशा पद्धतीच्या गैरकृत्याबाबत शैक्षणिक स्तरावरच प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जनजागृती करेल, अशा पद्धतीची चित्रफीत बनवावी, अशी सूचना देखील त्यांनी केली. पोलीस प्रशासनाने यामध्ये अन्न व औषधी विभागाची मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात जिल्ह्यामध्ये सण-उत्सवाचे पर्व सुरू होत असून या काळात मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीबाबत प्रयत्न केले जातात. याबाबत जागरूकतेने काम करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागाचे सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी जिल्हास्तरावर भेसळ ओळखणाऱ्या प्रयोगशाळेच्या गठनाबाबत प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश दिले. जिल्ह्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या भेसळीबाबतही अनेक तक्रारी आल्या असल्याचे उपस्थितांनी सांगितले. अन्न व औषधी प्रशासनामार्फत सन २०१८-२०१९ मध्ये ६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आली होती. त्यातील गुटखा व पानमसालाच्या संदर्भात दहा नमुने असुरक्षित आढळून आले असल्याने कारवाई करण्याचे सांगितले. या बैठकीला सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन नि.दी मोहिते, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी ज्ञानेश ढोके, दूध संघाचे अध्यक्ष मु.जे.बगमाटे, अन्नसुरक्षा अधिकारी प्र. अ. उमप, जी. टी.सातकर उपस्थित होते.नागरिकांनी तक्रार करावीअन्न पदार्थांमध्ये भेसळ असल्याने आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न पदार्थामध्ये भेसळ आाढळल्यास सामान्य नागरिकांनी टोल फ्री क्रमांकाचा वापर करुन किंवा स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात सुचना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी