नरेश पुगलिया : बल्लारपुरात पार पडली श्रद्धांजली सभाबल्लारपूर : शहराच्या विकासात माजी नगराध्यक्ष स्व. एम. बाल. बरैय्या यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९८० च्या दशकात काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला मोठा हातभार लावला. बल्लारपूर शहराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. काँग्रेसची विचारसरणी अनेकांना पटवून दिली. काँग्रेसच्या जडणघडणीत एम. बाल बरय्या यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केले. बल्लारपूर शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस नगर परिषद व बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेच्यावतीने स्थानिक बालाजी सभागृहात रविवारी शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन नरेश पुगलिया बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अॅड. एकनाथ साळवे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, मूलचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पूरम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, डॉ. सुरेश महाकुलकर, मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, अॅड. अविनाश ठावरी, अॅड. मेघा भाले, पद्माकर पांढरे, एम. व्यंकटेश बाल बरैय्या यांची उपस्थिती होती.संचालन घनश्याम मुलचंदानी यांनी तर आभार देवेंद्र आर्य यांनी मानले. यावेळी प्रवीण पडवेकर, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, नासिर खान, भास्कर माकोडे, सत्यनारायण, अनिल खरतड, पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम, चेतन गेडाम, गजानन दिवसे, रामदास वाग्दरकर, अनिल तुंगीडवार व डेव्हीड कामपेल्ली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेसच्या जडणघडणीत बरय्या यांचे मोठे योगदान
By admin | Updated: October 19, 2015 01:35 IST