शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

बापूू,आपला गावच बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

ज्यांचे आई-वडील गावाकडे आहेत अशांचा मुलगा, सून व नातवडांनी सुरक्षित राहता येईल. या भावनेतून आपले गाव गाठले. मात्र जे आपल्या आई-वडीलासह शहरात गेले असे अनेक जण आपण आपल्या गावी परतावे की, नाही या मनस्थितीत आजही शहरात वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुंबईच्या तुलनेत पुण्यात गेलेल्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : अनेकजण परतत आहे आपल्या गावी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : पोट भरण्यासाठी काम शोधून स्थायीक झालेले व नोकरीसाठी शहरात गेलेल्या शेकडो नागरिकांनी कोरोनाच्या धास्तीने बाबू, आपला गावच बरा म्हणत गावाचा रस्ता धरला आहे.ज्यांचे आई-वडील गावाकडे आहेत अशांचा मुलगा, सून व नातवडांनी सुरक्षित राहता येईल. या भावनेतून आपले गाव गाठले. मात्र जे आपल्या आई-वडीलासह शहरात गेले असे अनेक जण आपण आपल्या गावी परतावे की, नाही या मनस्थितीत आजही शहरात वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुंबईच्या तुलनेत पुण्यात गेलेल्यांची संख्या अधिक आहे.कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबई व पुणे येथेच जास्त असल्याने या शहरात आपण राहिलो तर आपण जीवंत राहू शकत नाही या भितीपोटी शेकडो जण गावी आले आहेत. मात्र परिस्थिती गंभीर बनली असून गावी परत येण्यासाठी बस सुद्धा नाहीत, अशी परिस्थिती आहे. अनेक जण शासकीय नोकरीनिमित्त किंवा कंपनीत नोकरीला आहेत, अशा मंडळीच्या मनात पुणे, मुंबई, शहर सोडायचे आहे, मात्र नोकरी असल्याने अनेक जण सध्या तरी आपल्या गावी येवू शकले नाहीत.परीस्थिती केव्हा कशी येथे याची जाण कुणालाही नाही. आजच्या परिस्थितीत खेड्यात राहायला कुणी तयार नाही. खेड्यात जो राहतो तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याला आपले भविष्य खेड्यात राहून सुधारणार नाही याची जाण आली. त्यामुळे आपल्याला काही बनायचे असेल अथवा पोट भरायचे असेल तर शहात जाण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखूनच प्रत्येक गावातील अनेक जणांनी शहर गाठून आपले बस्तान बसविले. मात्र कोरोना व्हायरसचा आजार जगभरात पसरला. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. आपल्या देशातही या आजाराने अनेक रुग्ण आहे. शेकडो जणांचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जो तो आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मात्र जीव धोक्यात घालायचा नसेल तर खेड्यात राहणे अधिक सुरक्षित आहे, हे कोरोनाच्या भितीपोटी का होईना, सगळ्याना समजले आहे. खरा भारत शोधायचा असेल तर खेड्यात चला असे महात्मा गांधी सांगत होते. आता कोरोनाच्या भितीपोटी शहरातले सगळे सोडून आधी आपले गाव गाठत असल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे.परिस्थिती बदललीजिल्ह्यातील अनेक युवक व बेरोजगार, नागरिक कामाच्या शोधात हैदराबाद, पुणे, मुंबई, आदी शहरात गेले आहे. मोठ्या शहरात कोणताही माणूस काम केल्यावर उपाशी मरत नाही, याची जाण असल्याने अनेकांनी मागील काही वर्षात शहर गाठून आपले बस्तान बसविले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.अनेक परतीच्या मार्गावरसुटीच्या दिवसात गावाकडे येणारे बहुतांश शहरी कुटुंबीय कोरोनामुळे गावाचा रस्ता धरला आहे. गावात शहराच्या तुलनेत कमी धोका असतो हे ओळखून शेकडो कुटुंबीय आपल्या गावी परतले आहेत. तर अनेक परतण्याच्या मार्गावर आहे. मात्र साधने नसल्याने ते अडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या