शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

बापूू,आपला गावच बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

ज्यांचे आई-वडील गावाकडे आहेत अशांचा मुलगा, सून व नातवडांनी सुरक्षित राहता येईल. या भावनेतून आपले गाव गाठले. मात्र जे आपल्या आई-वडीलासह शहरात गेले असे अनेक जण आपण आपल्या गावी परतावे की, नाही या मनस्थितीत आजही शहरात वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुंबईच्या तुलनेत पुण्यात गेलेल्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : अनेकजण परतत आहे आपल्या गावी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : पोट भरण्यासाठी काम शोधून स्थायीक झालेले व नोकरीसाठी शहरात गेलेल्या शेकडो नागरिकांनी कोरोनाच्या धास्तीने बाबू, आपला गावच बरा म्हणत गावाचा रस्ता धरला आहे.ज्यांचे आई-वडील गावाकडे आहेत अशांचा मुलगा, सून व नातवडांनी सुरक्षित राहता येईल. या भावनेतून आपले गाव गाठले. मात्र जे आपल्या आई-वडीलासह शहरात गेले असे अनेक जण आपण आपल्या गावी परतावे की, नाही या मनस्थितीत आजही शहरात वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुंबईच्या तुलनेत पुण्यात गेलेल्यांची संख्या अधिक आहे.कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबई व पुणे येथेच जास्त असल्याने या शहरात आपण राहिलो तर आपण जीवंत राहू शकत नाही या भितीपोटी शेकडो जण गावी आले आहेत. मात्र परिस्थिती गंभीर बनली असून गावी परत येण्यासाठी बस सुद्धा नाहीत, अशी परिस्थिती आहे. अनेक जण शासकीय नोकरीनिमित्त किंवा कंपनीत नोकरीला आहेत, अशा मंडळीच्या मनात पुणे, मुंबई, शहर सोडायचे आहे, मात्र नोकरी असल्याने अनेक जण सध्या तरी आपल्या गावी येवू शकले नाहीत.परीस्थिती केव्हा कशी येथे याची जाण कुणालाही नाही. आजच्या परिस्थितीत खेड्यात राहायला कुणी तयार नाही. खेड्यात जो राहतो तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याला आपले भविष्य खेड्यात राहून सुधारणार नाही याची जाण आली. त्यामुळे आपल्याला काही बनायचे असेल अथवा पोट भरायचे असेल तर शहात जाण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखूनच प्रत्येक गावातील अनेक जणांनी शहर गाठून आपले बस्तान बसविले. मात्र कोरोना व्हायरसचा आजार जगभरात पसरला. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. आपल्या देशातही या आजाराने अनेक रुग्ण आहे. शेकडो जणांचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जो तो आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मात्र जीव धोक्यात घालायचा नसेल तर खेड्यात राहणे अधिक सुरक्षित आहे, हे कोरोनाच्या भितीपोटी का होईना, सगळ्याना समजले आहे. खरा भारत शोधायचा असेल तर खेड्यात चला असे महात्मा गांधी सांगत होते. आता कोरोनाच्या भितीपोटी शहरातले सगळे सोडून आधी आपले गाव गाठत असल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे.परिस्थिती बदललीजिल्ह्यातील अनेक युवक व बेरोजगार, नागरिक कामाच्या शोधात हैदराबाद, पुणे, मुंबई, आदी शहरात गेले आहे. मोठ्या शहरात कोणताही माणूस काम केल्यावर उपाशी मरत नाही, याची जाण असल्याने अनेकांनी मागील काही वर्षात शहर गाठून आपले बस्तान बसविले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.अनेक परतीच्या मार्गावरसुटीच्या दिवसात गावाकडे येणारे बहुतांश शहरी कुटुंबीय कोरोनामुळे गावाचा रस्ता धरला आहे. गावात शहराच्या तुलनेत कमी धोका असतो हे ओळखून शेकडो कुटुंबीय आपल्या गावी परतले आहेत. तर अनेक परतण्याच्या मार्गावर आहे. मात्र साधने नसल्याने ते अडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या