शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...सेवानिवृत्तीला सात वर्षे, तरीही निवृत्ती वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही झाली माहिती नाही. त्यांची पेन्शन अजूनही सुरू झाली नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते बेडवरच होते. त्यामुळे याबाबत त्यांना साधी चौकशीही करता आली नाही.

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगणे तसे कठीणच,  वृद्धापकाळामुळे धावपळही मंदावते. अशातच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाकरिता तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेल्या पायपिटीमुळे कंटाळून आत्महत्येचा पर्याय पुढे केला. यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून लालफितशाहीचा परिचय दिला आहे. ही व्यथा म.रा. वीज वितरण कंपनीत जिवती येथून सेवानिवृत्त झालेल्या राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याची  आहे.प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही झाली माहिती नाही. त्यांची पेन्शन अजूनही सुरू झाली नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते बेडवरच होते. त्यामुळे याबाबत त्यांना साधी चौकशीही करता आली नाही. त्यांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागाने वरिष्ठांकडे पाठविला; परंतु त्यात काही त्रुटी असल्याने तो परत आला. त्यानंतर प्रशासनाने नेमके काय केले हे कळायला मार्ग नाही. बापूजी जंपलवार यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला, परंतु वीज वितरण कंपनीने त्यांच्या पेन्शनचे तर सोडाच त्यांच्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही.सेवानिवृत्तीनंतर तब्बल सात वर्षांपासून निवृत्तीवेतन मिळत नसल्याने जंपलवार कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावलेले असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकारामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊन त्यांनी दि. २४ मार्च २०२२ रोजी बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन निवृत्तीवेतनाअभावी माझ्यावर आत्महत्येसारख्या पर्यायाची निवड करण्याची वेळ आपण आणली. त्याला जवाबदार तुम्ही राहाल, अशा आशयाचे पत्र देऊन निवृत्तीवेतन त्वरित सुरू करण्याची विनंती केली. परंतु आज त्याही गोष्टीला दोन महिन्याला कालावधी लोटला; मात्र अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. 

बापूजी गणपती जंपलवार यांना निवृत्तीवेतनासाठी तब्बल सात वर्षांपासून वंचित ठेवून वीज वितरण कंपनीने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास वीज वितरण कंपनी विरोधात मोठे आंदोलन पुकारले जाईल. -रामचंद्र मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष, ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण