शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

बापरे...सेवानिवृत्तीला सात वर्षे, तरीही निवृत्ती वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही झाली माहिती नाही. त्यांची पेन्शन अजूनही सुरू झाली नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते बेडवरच होते. त्यामुळे याबाबत त्यांना साधी चौकशीही करता आली नाही.

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगणे तसे कठीणच,  वृद्धापकाळामुळे धावपळही मंदावते. अशातच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाकरिता तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेल्या पायपिटीमुळे कंटाळून आत्महत्येचा पर्याय पुढे केला. यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून लालफितशाहीचा परिचय दिला आहे. ही व्यथा म.रा. वीज वितरण कंपनीत जिवती येथून सेवानिवृत्त झालेल्या राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याची  आहे.प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही झाली माहिती नाही. त्यांची पेन्शन अजूनही सुरू झाली नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते बेडवरच होते. त्यामुळे याबाबत त्यांना साधी चौकशीही करता आली नाही. त्यांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागाने वरिष्ठांकडे पाठविला; परंतु त्यात काही त्रुटी असल्याने तो परत आला. त्यानंतर प्रशासनाने नेमके काय केले हे कळायला मार्ग नाही. बापूजी जंपलवार यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला, परंतु वीज वितरण कंपनीने त्यांच्या पेन्शनचे तर सोडाच त्यांच्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही.सेवानिवृत्तीनंतर तब्बल सात वर्षांपासून निवृत्तीवेतन मिळत नसल्याने जंपलवार कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावलेले असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकारामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊन त्यांनी दि. २४ मार्च २०२२ रोजी बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन निवृत्तीवेतनाअभावी माझ्यावर आत्महत्येसारख्या पर्यायाची निवड करण्याची वेळ आपण आणली. त्याला जवाबदार तुम्ही राहाल, अशा आशयाचे पत्र देऊन निवृत्तीवेतन त्वरित सुरू करण्याची विनंती केली. परंतु आज त्याही गोष्टीला दोन महिन्याला कालावधी लोटला; मात्र अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. 

बापूजी गणपती जंपलवार यांना निवृत्तीवेतनासाठी तब्बल सात वर्षांपासून वंचित ठेवून वीज वितरण कंपनीने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास वीज वितरण कंपनी विरोधात मोठे आंदोलन पुकारले जाईल. -रामचंद्र मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष, ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण