शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बंदी असलेले चोर बिटी बियाण्यांची विक्री जोरात ! कृषी विभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:35 IST

मूल तालुक्यात : शेतकऱ्यांनो सावधान ! बियाण्यांमुळे शेतजमीन होते नापीक

धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मागील वर्षी अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हे दुःख विसरून आता शेतकरी बांधव येणाऱ्या खरिपाच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. दरम्यान, शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बी-बियाण्यांची खरेदी करून आतापासूनच घरी जमा करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत शासनाची बंदी असलेले चोर बिटी बियाण्यांची विक्री जोरात सुरू असून, याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

चोर बिटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाण्यांवर बंदी घातली आहे. मात्र, तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे जिल्ह्यात आणली जात आहेत. कृषी विभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याने या बियाण्यांची खुलेआम विक्री जिल्हाभरात सुरू आहे. मागील काही वर्षापासून शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तणनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात. तणनाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र, चोर बिटी या कापसाची लागवड केल्यास तणनाशकाचा काहीच परिणाम पिकावर होत नाही. त्यामुळे चोर बिटीची लागवड करून शेतकरी तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.

कमी जागेत जास्त उत्पादनाचे आमिषमूल तालुक्यातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यातील बेंबाळ, जुनासुर्ला, गडीसुर्ला, नांदगाव या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. मात्र, यावर्षी कापसाच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी मात्र कमालीचे हैराण झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याच्या आमिषेपोटी प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांच्या खरेदीला बळी पडत आहे. त्याचाच फायदा घेत परिसरातील नफाखोर व्यापारी तसेच दलाल घेताना दिसून येत आहेत. मात्र, याबाबत कृषी विभाग मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

तणनाशके घातकचअतिशय घातक असलेली तणनाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बिटी या बियाण्यांवर बंदी घातली आहे. तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र, तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात आणले जात आहेत. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

कृषी अधिकारी व कृषी केंद्र चालकांची मिलीभगतकृषी केंद्रांमध्ये खुलेआम चोर बिटी बियाण्यांची विक्री होत असताना कृषी विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. यावरून कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व कृषी केंद्र संचालक यांच्यामध्ये मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाचे अधिकारी एकाही कृषी केंद्रांवर कारवाई करीत नाही. याची पक्की खातरजमा येथील कृषी केंद्र संचालकांना झाली असल्याने चोर बिटी बियाणांचा काळा बाजार वाढला आहे. एकूण लागवडीच्या सुमारे ८० टक्के बियाणे चोर बिटी वापरले जात आहेत. मात्र, कृषी विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

८० % कृषी विभागाने बियाणे जप्त करावे बियाणे चोर बिटी वापरले जात आहेत. तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित असलेले हे बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात आणले जात आहेत. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरcottonकापूस