शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शाळांच्या शून्य बॅलन्समुळे गणवेष रकमेतून बँकांनी केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

मुख्याध्यापकांनी पुन्हा नवीन खाते काढले. दरम्यान, आता गणवेशासाठी निधी आला; मात्र तो महाराष्ट्र बँकेच्या नवीन खात्यात जमा न करता जुन्या समग्रच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रशासनाने  मुख्याध्यापकांना सांगितले. काही मुख्याध्यापकांनी मिळालेले धनादेश समग्रच्या खात्यात जमा केले; मात्र  शून्य बॅलन्स असल्यामुळे बँकांनीया गणवेशाच्या निधीतून काही रक्कम कपात केली. विशेष म्हणजे, यासाठी जीएसटीसुद्धा कट केला.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश दिला जातो. यावर्षीही सत्र संपतानाच्या दिवसामध्ये गणवेश मिळणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना तीनशे रुपये प्रमाणे रक्कम शाळांच्या खात्यात प्रशासनाने जमा केली आहे; मात्र शाळांच्या समग्र शिक्षा खात्यामध्ये शून्य बॅलन्स असल्याने बँकांनी धनादेश जमा होताच मिनिमम बॅलन्स तसेच जीएसटीच्या नावाखाली पैसे कट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गणवेश घेताना शाळा व्यवस्थापन समितीला काटकसर करावी लागणार आहे. दुसरीकडे गणवेशाचा हिशेब देतानाही मुख्याध्यापकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पूर्वी शाळांचे सर्व शिक्षा अभियान खाते होते. या खात्यातून संपूर्ण व्यवहार चालायचा; मात्र प्रशासनाने या खात्याचे नाव  बदलण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी  समग्र शिक्षाच्या नावाने बँकेतील खाते सुरु केले. शाळांचे व्यवहार सुरळीत सुरु असताना चालू शैक्षणिक वर्षामध्ये बँकेमधील निधी शासनाकडे जमा करण्याचे तसेच महाराष्ट्र बँकेमध्ये नवीन खाते काढण्याचा नवा आदेश शाळांत धडकला. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पुन्हा नवीन खाते काढले. दरम्यान, आता गणवेशासाठी निधी आला; मात्र तो महाराष्ट्र बँकेच्या नवीन खात्यात जमा न करता जुन्या समग्रच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रशासनाने  मुख्याध्यापकांना सांगितले. काही मुख्याध्यापकांनी मिळालेले धनादेश समग्रच्या खात्यात जमा केले; मात्र  शून्य बॅलन्स असल्यामुळे बँकांनीया गणवेशाच्या निधीतून काही रक्कम कपात केली. विशेष म्हणजे, यासाठी जीएसटीसुद्धा कट केला. परिणामी प्रत्येक विद्यार्थ्यांना ३०० रुपयांप्रमाणे मिळणारा निधी आता कमी होणार असून हिशेब देताना मुख्याध्यापकांनाही अडचणीचा सामना करावा लागणार आहे. यासंदर्भात चंद्रपूर पंचायत समितीतील एका मुख्याध्यापकांनी  प्रशासनाकडे तक्रार सुद्धा केली आहे.

ताण वाढलाशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती ठरविणार तो गणवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना ३०० रुपयांप्रमाणे मिळणार आहे; मात्र आता गणवेशाच्या रकमेतून काही बँकांनी मिनिमम बॅलन्स तसेच जीएसटी कट केल्यामुळे आता विद्यार्थ्यांना मिळणारा निधी कमी होणार आहे.

समग्रच्या खात्यात शून्य बॅलन्स असल्यामुळे काही बँकांनी जीएसटी आणि मिनिमम बॅलन्सच्या नावावर काही रक्कम कट केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश घेताना ती रक्कम कमी पडणार आहे. ती रक्कम प्रशासनाने द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गणवेशातून ती कपात होणार नाही.  त्यातच मुख्याध्यापकांना गणवेशाचा हिशेब देताना अडचणीचे होणार नाही.-प्रकाश चुनारकरकार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक

 

टॅग्स :Schoolशाळाbankबँक