शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शाळांच्या शून्य बॅलन्समुळे गणवेष रकमेतून बँकांनी केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

मुख्याध्यापकांनी पुन्हा नवीन खाते काढले. दरम्यान, आता गणवेशासाठी निधी आला; मात्र तो महाराष्ट्र बँकेच्या नवीन खात्यात जमा न करता जुन्या समग्रच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रशासनाने  मुख्याध्यापकांना सांगितले. काही मुख्याध्यापकांनी मिळालेले धनादेश समग्रच्या खात्यात जमा केले; मात्र  शून्य बॅलन्स असल्यामुळे बँकांनीया गणवेशाच्या निधीतून काही रक्कम कपात केली. विशेष म्हणजे, यासाठी जीएसटीसुद्धा कट केला.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश दिला जातो. यावर्षीही सत्र संपतानाच्या दिवसामध्ये गणवेश मिळणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना तीनशे रुपये प्रमाणे रक्कम शाळांच्या खात्यात प्रशासनाने जमा केली आहे; मात्र शाळांच्या समग्र शिक्षा खात्यामध्ये शून्य बॅलन्स असल्याने बँकांनी धनादेश जमा होताच मिनिमम बॅलन्स तसेच जीएसटीच्या नावाखाली पैसे कट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गणवेश घेताना शाळा व्यवस्थापन समितीला काटकसर करावी लागणार आहे. दुसरीकडे गणवेशाचा हिशेब देतानाही मुख्याध्यापकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पूर्वी शाळांचे सर्व शिक्षा अभियान खाते होते. या खात्यातून संपूर्ण व्यवहार चालायचा; मात्र प्रशासनाने या खात्याचे नाव  बदलण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी  समग्र शिक्षाच्या नावाने बँकेतील खाते सुरु केले. शाळांचे व्यवहार सुरळीत सुरु असताना चालू शैक्षणिक वर्षामध्ये बँकेमधील निधी शासनाकडे जमा करण्याचे तसेच महाराष्ट्र बँकेमध्ये नवीन खाते काढण्याचा नवा आदेश शाळांत धडकला. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पुन्हा नवीन खाते काढले. दरम्यान, आता गणवेशासाठी निधी आला; मात्र तो महाराष्ट्र बँकेच्या नवीन खात्यात जमा न करता जुन्या समग्रच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रशासनाने  मुख्याध्यापकांना सांगितले. काही मुख्याध्यापकांनी मिळालेले धनादेश समग्रच्या खात्यात जमा केले; मात्र  शून्य बॅलन्स असल्यामुळे बँकांनीया गणवेशाच्या निधीतून काही रक्कम कपात केली. विशेष म्हणजे, यासाठी जीएसटीसुद्धा कट केला. परिणामी प्रत्येक विद्यार्थ्यांना ३०० रुपयांप्रमाणे मिळणारा निधी आता कमी होणार असून हिशेब देताना मुख्याध्यापकांनाही अडचणीचा सामना करावा लागणार आहे. यासंदर्भात चंद्रपूर पंचायत समितीतील एका मुख्याध्यापकांनी  प्रशासनाकडे तक्रार सुद्धा केली आहे.

ताण वाढलाशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती ठरविणार तो गणवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना ३०० रुपयांप्रमाणे मिळणार आहे; मात्र आता गणवेशाच्या रकमेतून काही बँकांनी मिनिमम बॅलन्स तसेच जीएसटी कट केल्यामुळे आता विद्यार्थ्यांना मिळणारा निधी कमी होणार आहे.

समग्रच्या खात्यात शून्य बॅलन्स असल्यामुळे काही बँकांनी जीएसटी आणि मिनिमम बॅलन्सच्या नावावर काही रक्कम कट केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश घेताना ती रक्कम कमी पडणार आहे. ती रक्कम प्रशासनाने द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गणवेशातून ती कपात होणार नाही.  त्यातच मुख्याध्यापकांना गणवेशाचा हिशेब देताना अडचणीचे होणार नाही.-प्रकाश चुनारकरकार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक

 

टॅग्स :Schoolशाळाbankबँक