शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

उखडलेल्या रस्त्यांवर सहा कोटींची ‘मलमपट्टी’

By admin | Updated: October 30, 2014 22:49 IST

औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपला

लखमापूर: औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र रस्त्यांची अवस्था आजही गंभीर आहे. त्यामुळे मलमपट्टीवर खर्च करण्यात आलेला पैसा गेला तरी कुठे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.कोरपना तालुक्यात सन २०१०-११ पासून तर, आजतागायत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. गडचांदूर, सोनुर्ली, वनसडी या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी १ कोटी १९ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला. त्यानंतर रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करून कामपूर्ण झाल्याचा देखावा करण्यात आला. अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. आता हेच खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. कन्हाळगाव, पारडी, चनई, मांडवा, वनसडी, पकडीगुड्डम, पिपर्डा, कुसळ, धानोली, येरगव्हाण, वनोजा, नारंडा, भोयेगाव आदी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्र्रमाणात खर्च करण्यात आला. यातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती झाली नसतानाही कागदोपत्री रस्त्यांची दुरुस्ती दाखवून बिल उचलण्यात आल्याचे समजते.कोरपना, कोडशी, हेटी, कोरपना, तांबडी, कोडशी मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. यातही अर्धवट काम केल्याने याही रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही वर्षामध्ये बांधकाम विभागाला रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती आणि रस्त्याच्या कडेला असलेले झुडपे तोडण्यासाठी जवळपास सहा कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला. या निधीतून रस्ते चकचकीत नाही पण किमान खड्डे बुजविणे अपेक्षित होते. मात्र रस्त्यावरील खड्डे काही कमी झाले नाही. गडचांदूर, वनसडी, कोरपना हा मुख्य मार्ग समोर आंध्रप्रदेशातील आदिलाबादकडे जातो. या मार्गावर अनेकवेळा अपघात झाले आहे. वाहनांची सारखी वर्दळ असते. यातच वनसडी, सोनुर्लीजवळ रस्त्याचे कठडे उघडे पडले आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. गडचांदूर-नांदाफाटा मुख्य मार्गावरही रस्त्यावर खड्डे पडले आहे. काही दिवसापूर्वी बांधकाम विभागाने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्र्रयत्न केला. मात्र दोन-चार दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडले आहे. या रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे आबिद अली यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)