शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरसह मुंबई, पुणे व नागपुरात यंदा बांबूच्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:12 IST

बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी)कडून आगळीवेगळी भेटच ठरणार आहे.

ठळक मुद्दे५० हजार राख्यांचे उद्दिष्ट्यरक्षाबंधनाला चंद्रपूर बीआरटीसीची अनोखी भेट

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहिण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहिण आधीच राखीचा बेत ठरवून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी)कडून आगळीवेगळी भेटच ठरणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू उत्पादन होते. बांबूवर आधारित उद्योग असावा. त्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील विविध भागात नव्या रोजगाराची निर्मिती व्हावी, या उद्दात्त हेतूने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. हे केंद्र सुरू झाल्यापासून हजारो हातांना काम मिळाले. बांबूपासून घराच्या दिवाणखाण्यापासून तर कार्यालयात शोभून दिसेल अशा वस्तूंची निर्मिती सुरू झाली. आता या केंद्राने एक पाऊल पुढे टाकत यावर्षीपासून बांबूपासून चक्क राख्या बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आणि बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून कामही सुरू आहे. या केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार प्रशिक्षण केंद्रात १३० महिला मागील १५ दिवसांपासून या राख्या बनविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. आतापर्यंत २० हजार राख्या तयार झाल्याअसून मागणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने २० आॅगस्टपर्यंत ५० हजार राख्यांचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यवेक्षिका योगिता साठवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मुंबई, पुणे व नागपुरातून मागणीबांबूपासून राखी निर्मितीची कल्पनाच नाविन्यपूर्ण होती. ही कल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही आवडली. या राख्यांना राज्यात मोठी मागणी आहे. पहिले वर्ष असल्यामुळे चंद्रपूर, मुंबई, पुणे व नागपूर या महानगरात या राख्या पाठविण्यात येणार असल्याचे बांबू रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग सेंटरचे संचालक राहुल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वनमंत्र्यांना आज राखी बांधून होणार भुभारंभबांबूपासून बनविलेल्या राख्यांबाबत सर्वत्र कुतुहल निर्माण झाले आहे. ही राखी सर्वप्रथम मंगळवार दि. १४ आॅगस्टला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बांधून या नवोपक्रमाचा शुभारंभ बल्लारपूर येथून करण्यात येणार आहे. यानंतर या राख्या मागणी असलेल्या बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Rakhiराखी