शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

बांबूअभावी बुरड व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: October 28, 2014 22:54 IST

शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने

ब्रह्मपुरी : शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने त्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.प्लास्टिकच्या युगात बांबूपासून बनविलेल्या वस्तूंना फारशी मागणी नाही. मात्र, बांबूच्या काही वस्तू गृहोपयोगी म्हणून आवश्यक ठरल्या आहेत. टोपल्या, सुप, बेंडवे आदी वस्तू प्लास्टिकच्या बनविल्या जात नाही. उलट त्या वस्तू बांबूपासून बनविल्याने महत्त्वपूर्ण ठरत असतात. परंतु, मागील एक ते दीड वर्षापासून बुरड व्यवसायिकांना चांगल्या प्रतीचा बांबू पुरविण्यात आलेला नाही. त्यामुळे पारंपारिक धंदा डबघाईस आलेला आहे. बुरड व्यवसायिकांना पुरविण्यात येणारा बांबू अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यांना पुरविण्यात येत आहे. त्यामुळे बुरड व्यावसायिकांना नेहमीच वनविभागाकडून टंचाई भासवली जात आहे. एखाद्या वेळी बांबू दिल्या गेल्या तर तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असते. त्यामुळे वस्तू बनविण्यात अडथळा निर्माण होऊन चांगल्या प्रतिचा माल तयार होत नसल्याचेही बुरड व्यवसायिकांकडून सांगितल्या जात आहे. पारंपारिक धंद्याला लागणारा बांबू पुरविल्या जात नसल्याने धंदा ठप्प झाला आहे. म्हणून कुटूंबातील काही कर्ते पुरुषमंडळी रिक्शा चालविणे, हमाली करणे व मिळेल तो काम करण्यावर अवलंबून राहून आपली उपजीविका भागवित आहेत. शासनस्तरावर या अन्यायाप्रती आवाज उठविला आहे. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष नाही. पारंपरिक व्यवसायाला बांबू पुरविण्यात वनविभाग असमर्थ असेल तर प्रत्येक कुटुंबाला शासनाने कमीतकमी पाच एकर शेती पोट भरण्यासाठी द्यावी, अशी मागणी बुरड समाजातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)