शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

बांबूअभावी बुरड व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: October 28, 2014 22:54 IST

शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने

ब्रह्मपुरी : शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने त्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.प्लास्टिकच्या युगात बांबूपासून बनविलेल्या वस्तूंना फारशी मागणी नाही. मात्र, बांबूच्या काही वस्तू गृहोपयोगी म्हणून आवश्यक ठरल्या आहेत. टोपल्या, सुप, बेंडवे आदी वस्तू प्लास्टिकच्या बनविल्या जात नाही. उलट त्या वस्तू बांबूपासून बनविल्याने महत्त्वपूर्ण ठरत असतात. परंतु, मागील एक ते दीड वर्षापासून बुरड व्यवसायिकांना चांगल्या प्रतीचा बांबू पुरविण्यात आलेला नाही. त्यामुळे पारंपारिक धंदा डबघाईस आलेला आहे. बुरड व्यवसायिकांना पुरविण्यात येणारा बांबू अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यांना पुरविण्यात येत आहे. त्यामुळे बुरड व्यावसायिकांना नेहमीच वनविभागाकडून टंचाई भासवली जात आहे. एखाद्या वेळी बांबू दिल्या गेल्या तर तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असते. त्यामुळे वस्तू बनविण्यात अडथळा निर्माण होऊन चांगल्या प्रतिचा माल तयार होत नसल्याचेही बुरड व्यवसायिकांकडून सांगितल्या जात आहे. पारंपारिक धंद्याला लागणारा बांबू पुरविल्या जात नसल्याने धंदा ठप्प झाला आहे. म्हणून कुटूंबातील काही कर्ते पुरुषमंडळी रिक्शा चालविणे, हमाली करणे व मिळेल तो काम करण्यावर अवलंबून राहून आपली उपजीविका भागवित आहेत. शासनस्तरावर या अन्यायाप्रती आवाज उठविला आहे. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष नाही. पारंपरिक व्यवसायाला बांबू पुरविण्यात वनविभाग असमर्थ असेल तर प्रत्येक कुटुंबाला शासनाने कमीतकमी पाच एकर शेती पोट भरण्यासाठी द्यावी, अशी मागणी बुरड समाजातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)