शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

बांबूअभावी बुरड व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: October 28, 2014 22:54 IST

शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने

ब्रह्मपुरी : शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने त्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.प्लास्टिकच्या युगात बांबूपासून बनविलेल्या वस्तूंना फारशी मागणी नाही. मात्र, बांबूच्या काही वस्तू गृहोपयोगी म्हणून आवश्यक ठरल्या आहेत. टोपल्या, सुप, बेंडवे आदी वस्तू प्लास्टिकच्या बनविल्या जात नाही. उलट त्या वस्तू बांबूपासून बनविल्याने महत्त्वपूर्ण ठरत असतात. परंतु, मागील एक ते दीड वर्षापासून बुरड व्यवसायिकांना चांगल्या प्रतीचा बांबू पुरविण्यात आलेला नाही. त्यामुळे पारंपारिक धंदा डबघाईस आलेला आहे. बुरड व्यवसायिकांना पुरविण्यात येणारा बांबू अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यांना पुरविण्यात येत आहे. त्यामुळे बुरड व्यावसायिकांना नेहमीच वनविभागाकडून टंचाई भासवली जात आहे. एखाद्या वेळी बांबू दिल्या गेल्या तर तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असते. त्यामुळे वस्तू बनविण्यात अडथळा निर्माण होऊन चांगल्या प्रतिचा माल तयार होत नसल्याचेही बुरड व्यवसायिकांकडून सांगितल्या जात आहे. पारंपारिक धंद्याला लागणारा बांबू पुरविल्या जात नसल्याने धंदा ठप्प झाला आहे. म्हणून कुटूंबातील काही कर्ते पुरुषमंडळी रिक्शा चालविणे, हमाली करणे व मिळेल तो काम करण्यावर अवलंबून राहून आपली उपजीविका भागवित आहेत. शासनस्तरावर या अन्यायाप्रती आवाज उठविला आहे. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष नाही. पारंपरिक व्यवसायाला बांबू पुरविण्यात वनविभाग असमर्थ असेल तर प्रत्येक कुटुंबाला शासनाने कमीतकमी पाच एकर शेती पोट भरण्यासाठी द्यावी, अशी मागणी बुरड समाजातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)