शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

बांबू कलेतून जिल्हा रोजगाराभिमुख होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:53 IST

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विसापूर येथे ‘भाऊ’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. महिला शक्तीच्या पाठीमागे खंबीर उभा असून बांबू कला प्रशिक्षणातून जिल्हा रोजगाराभिमुख करण्याचा संकल्प राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विसापूर येथे ‘भाऊ’ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बीपीएड कॉलेज मार्गावर बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट अर्थात भाऊ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी नामदार मुनगंटीवार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळ, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी, एफडीसीएमचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, जि. प. सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, गौतम निमगडे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची प्रसार माध्यमाने सिंगापूरपर्यंत पोहचविली. बांबू कला जगात प्रसिद्धीला येत आहे. बांबू कलेतून तयार साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. आकर्षक वस्तूंनी अनेकांना भुरळ पाडली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सामान्याचे जीवनमान उंचावणाऱ्या असून लाभान्वितांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील लाखांवर कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेतून धान्य देण्याचा प्रयत्न असून कोणीही उपासी राहणार नाही, अशी व्यवस्था केली जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.विजय टोंगे व किशोर पंदीलवार यांना बांबू रोपटे प्रदान करून शेती उन्नत करण्याचा मार्ग दाखविला. महिला बचत गटांना टूल किटचे वाटप देखील करण्यात आले.