शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बांबू कलेतून जिल्हा रोजगाराभिमुख होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:53 IST

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विसापूर येथे ‘भाऊ’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. महिला शक्तीच्या पाठीमागे खंबीर उभा असून बांबू कला प्रशिक्षणातून जिल्हा रोजगाराभिमुख करण्याचा संकल्प राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विसापूर येथे ‘भाऊ’ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बीपीएड कॉलेज मार्गावर बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट अर्थात भाऊ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी नामदार मुनगंटीवार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळ, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी, एफडीसीएमचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, जि. प. सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, गौतम निमगडे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची प्रसार माध्यमाने सिंगापूरपर्यंत पोहचविली. बांबू कला जगात प्रसिद्धीला येत आहे. बांबू कलेतून तयार साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. आकर्षक वस्तूंनी अनेकांना भुरळ पाडली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सामान्याचे जीवनमान उंचावणाऱ्या असून लाभान्वितांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील लाखांवर कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेतून धान्य देण्याचा प्रयत्न असून कोणीही उपासी राहणार नाही, अशी व्यवस्था केली जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.विजय टोंगे व किशोर पंदीलवार यांना बांबू रोपटे प्रदान करून शेती उन्नत करण्याचा मार्ग दाखविला. महिला बचत गटांना टूल किटचे वाटप देखील करण्यात आले.