शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

बल्लारपूूर पोलीस ठाण्याची उंच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:58 IST

बल्लारपूर पोलीस स्टेशनची भव्य आणि देखणी इमारत दिमाखात उभी झाली आहे. तिच्यासोबतच निवासी इमारतीचे लोकार्पण शुक्रवारला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : नवीन इमारतीचे शुक्रवारी लोकार्पण

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशनची भव्य आणि देखणी इमारत दिमाखात उभी झाली आहे. तिच्यासोबतच निवासी इमारतीचे लोकार्पण शुक्रवारला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.या प्रशस्त इमारतीचा दर्शनी भाग ऐतिहासिक किल्ल्याच्या परकोटाप्र्रमाणे सुशोभित, इमारतीत लहान मोठ्या एकूण २७ खोल्या आणि त्यात उत्तम आरामदायी आसन व्यवस्था, समोर छोटी बाग व पलिकडे मोकळे मैदान. ही साजसज्जा बघणारे म्हणतात एवढे प्रशस्त व देखणे पोलीस स्टेशन आम्ही प्रथमच बघतो आहोत. ना. मुनगंटीवार या नियोजित इमारतीबाबत भाषणात म्हणत असत की ही इमारत व तेथील व्यवस्था इतकी सुंदर असणार की, सर्वच भारावून जातील.सुमारे ५० वर्षापूर्वी बल्लारपूरचे पोलीस स्टेशन वस्ती भागात गांधी चौकाजवळ तीन खोल्या असलेल्या कौलारू घरात होते. त्याच्या जवळच गांधी चौकाला लागून नगरपालिकेची इमारत होती. या इमारतीला आग लागून ती जळाल्यानंतर नगरपालिका कार्यालय कॉलरी ते रेल्वे उड्डाणपुल मार्गावरील एका इमारतीत आताचे काबरा यांचे निवासस्थान हलविण्यात आले. रविवारचा आठवडी बाजार ओळ, गांधी चौक, नेहरू चौक या क्षेत्रात रेल्वे लाईनच्या पलिकडे जंगल साफ होऊन तेथे लोकवस्ती बसली. प्रशासकीय इमारत शहराच्या मध्यभगी असावी, या हेतूने सन १९६३ च्या दरम्यान चंद्रपूर - बल्लारपूर या मार्गावर नगरपालिका तसेच पोलीस स्टेशन यांच्या इमारती बांधून तेथेही कार्यालय हलविण्यात आलीत. आजही कार्यालय या जागेवर आहेत. आठवडी बाजार ही गांधी चौकातून हलवून नगरपालिका भवनामागे भरविण्यात आली. गांची चौकातील पोलीस स्टेशनच्या जागी पोलिसांकरिता क्वार्टर्स उभे करण्यात आले. शहरातील पोलीस स्टेशन, नगरपालिका, आठवडी बाजार जवळ जवळ झाले आहेत. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस स्टेशनची सुसज्ज इमारत बांधण्याचा संकल्प दोन वर्षापूर्वी केला व पोलीस स्टेशन सोबतच पोलीस क्वार्टर नऊ कोटी ८९ लाख रूपये खर्च करून बांधले. पोलीस स्टेशनची इमारत देखणी व प्रशस्त झाली. यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ही पुरेशी असणे गरजेचे आहे. कारण पुरेसे कर्मचारी नाहीत. अशी ओरड या पोलीस स्टेशनबाबत नेहमीच ऐकायला मिळते. याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.