बल्लारपूर : दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बल्लारपूर तालुक्यात शहरातील ग्रामीण रुग्णालय व ग्रामीण भागात कळमना उपकेंद्रांतर्गत बामणी येथे ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना लस देण्यात येत असून आतापर्यंत २ हजार ३६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत ११ हजार ९३ जणांची ॲंटीजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणी सर्व्हर डाऊनमुळे होत नसल्याचे सांगण्यात येते तर कुठे नेटवर्क मिळत नाही, अशा तक्रारी आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी केली आहे.
बल्लारपूर तालुक्यात शहरात ग्रामीण रुग्णालय व ग्रामीण भागात कळमना प्राथमिक केंद्रांतर्गत बामणी येथे लस देण्याचे एक असे तालुक्यात दोनच केंद्र असल्यामुळे लसीकरणाचा वेग कमी आहे. ते वाढविणे गरजेचे आहे. शहरी भागात पहिल्या टप्प्यात १ हजार ३११ जणांना लस देण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात २६५ जणांनी लस घेतली. ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात ४२३ व दुसऱ्या टप्प्यात ३९ जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ४१६ ज्येष्ठ नागरिक आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी,व इतर ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे नागरिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सध्या लस नोंदणी को-विन ॲपच्या व तालुक्यातील ४६ सेतू केंद्राच्या माध्यमातून होत असल्याची माहिती तहसीलदार संजय राईंचवार यांनी दिली आहे.