शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

बल्लारपूर नगरपालिका झाली ७१ वर्षांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका बनवून आज ७१ वर्षे झाली आहेत. तत्पूर्वी हे गाव नोटेफाईंड एरिया (आताचे नगरपंचायत) या दर्जात ...

बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका बनवून आज ७१ वर्षे झाली आहेत. तत्पूर्वी हे गाव नोटेफाईंड एरिया (आताचे नगरपंचायत) या दर्जात होते. गावाची लोकसंख्या दहा हजारांचे वर झाल्यानंतर ४ जानेवारी १९४९ ला नोटेफाईंड एरियामधून नगरपालिकेत परावर्तित झाले.

१९४१ ला या गावाची लोकसंख्या ८ हजार ७१२ एवढी कमी होती. दर दहा वर्षांनी ती याप्रमाणे वाढत गेली. १९५१ ला १२ हजार ४७१, १९६१ ला २० हजार ३५१, १९७१ लाख ३४ हजार २६८, १९८१ ला ६१हजार ३९८, १९९१ ला ८३ हजार ५११, २००१ ला ८९ हजार ९९५ तर २०११ ला ८९ हजार ४५२ अशी नोंदविण्यात आली आहे. २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये शहराची लोकसंख्या ५४३ ने घटली आहे, हे येथे उल्लेखनीय !

नगरपालिकेचे कार्यालय प्रारंभी गांधी चौकातील इमारतीत होते. आगीत इमारत पूर्णतः जळाल्यानंतर डॉ. आंबेडकर भवन ते रेल्वे स्टेशन रोडवर एका किरायाच्या घरात (आताचे काबरा निवास) नवीन कार्यालय झाले. नगरपालिकेचा कारभार तिथून चालायचा. शहराचा जलदगतीने विस्तार होऊ लागल्यानंतर चंद्रपूर रोडवर स्वतःच्या मालकीची इमारत बांधून सुमारे १९६० चे दरम्यान कार्यालय हलविण्यात आले. १९४९ पासून आजपर्यंत एकूण २६ नगराध्यक्षांनी या नगराचा कारभार सांभाळला आहे.

हरीश शर्मा हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. तीन नगराध्यक्ष जनतेच्या मतांवर निवडून आले. नोटेफाईंड एरियापासूनच या गावाला रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक, कोळसा खाण, लाकडाची मोठी बाजारपेठ, पावर हाऊस यामुळे महत्त्व प्राप्त झाले.

बॉक्स

पेपरमीलमुळे वाढली लोकसंख्या

नगरपालिका बनण्याच्या दरम्यान पेपरमील झाले आणि त्यापासून लोकसंख्या तीव्र गतीने वाढायला लागली. सोबतच लहान-मोठे उद्योग झाले. गेल्या काही वर्षांत नागरिक सुविधा, सौंदर्यीकरण याबाबत या शहराची झपाट्याने प्रगती झाली. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने बल्लारपूर तहसील झाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रही निर्माण झाले.