शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बल्लारपूर मतदार संघाने चुलमुक्त अभियानात घेतली आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST

प्रायोगिक तत्त्वावर बल्लारपूर क्षेत्रात बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे हा आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जंगलतोडीवरही आळा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुटुंबातील महिलांना स्वयंपाक करताना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे आणि सर्वांना गॅस कनेक्शन मिळावे, जंगल तोडीवर आळा बसावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना देशामध्ये सुरू केली आहे. हा प्रकल्प पथदर्शी म्हणून सुरुवातीला बल्लारपूर मतदार क्षेत्रात व त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प करण्यात आला. हा संकल्प पूर्णत्वास गेला असून बल्लारपूर मतदार क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण पूर्ण झाले आहे.हळूहळू याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात गॅस कनेक्शन देण्यात आले. लवकरच जिल्ह्यातील सर्व कुटुंबातील महिलांना गॅस कनेक्शन मिळावे, याचे नियोजन केले जात आहे. कोणत्याही कुटुंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करावा लागू नये, सर्व गावे, शहरे धूरमुक्त व्हावे, हा या योजनेमागील उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबांना १०० टक्के गॅस कनेक्शन मिळावे यासाठी १०० टक्के गॅस जोडणीचा हा उपक्रम राबविला आहे.प्रायोगिक तत्त्वावर बल्लारपूर क्षेत्रात बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे हा आहे.या उपक्रमांतर्गत गॅस वितरण उज्वला योजना, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना (संयुक्त वनव्यवस्थापन समिती, वनविभाग) सामाजिक उत्तरदायित्व निधीतून गॅस वाटप केलेले आहे.अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्रचंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टतर्फे २७ सप्टेंबर २०१८ रोजी मान्यता देण्यात आली आहे. अजयपूर येथे सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या केंद्रासाठी अजयपूर येथील ८ ते १० एकर जमा उपलब्ध करून देण्याबाबत पी.एन.बी.फार्मर्स वेलफेअर ट्रस्टने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने राज्य मंत्रीमंडळाने ६ एप्रिल २०१७ रोजी मान्यता दिली आहे. अजयपूर शासकीय जमीन या प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहे. राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयानंतर पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला ट्रस्टने मान्यता दिल्यामुळे या संस्थेचे भारतातील अशा पद्धतीचे अकरावे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. शेती, शेतकरी, कृषी संस्कृती व अर्थार्जन या सर्वच विषयाला विभागाचा आर्थिक उत्कर्ष लक्षात घेवून या ठिकाणावरुन हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास याची मदत होणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना देशामध्ये सुरू केली तेव्हा हा प्रकल्प पथदर्शी म्हणून बल्लारपूर मतदार संघात राबविण्याची आपली इच्छा होती. आज हा मतदार संघ चूलमुक्त झाला आहे, याचा आनंद आहे. यासोबतच आपण पंजाब नॅशनल बँकेच्या उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करून चंद्रपूर जिल्ह्यात अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- सुधीर मुनगंटीवार, अर्थ, नियोजन व वनेमंत्री,महाराष्ट्र शासन.नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना सुरू केलीे. ही योजना पाकलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम बल्लारपूर मतदार संघात राबविली. सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले. आता लाकडे आणायला जंगलात जावे लागत नाही. त्यामुळे महिला व पुरुषांचा बराच वेळ वाचतो. याशिवाय वन्यप्राणी हल्ल्याची भीतीही राहिलेली नाही.-विद्या देवाळकर, विसापूर.आता घरोघरी शासनाकडून गॅस कनेक्शन मिळाले आहे. यामुळे महिला वर्ग आनंदी आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे आभार मानावेच लागेल. महिला धूरमुक्त झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यही आता चांगले राहणार आहे.-किरण दुधे, बल्लारपूर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार