शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

बल्लारपुरात दररोज २२ टक्के गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देजलवाहिन्या बदलविण्याचे काम सुरू। ४५ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

मंगल जीवने ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे दोन वर्षांपासून बदलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीत दररोज सुमारे २२ टक्के जल गळती होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या अंतर्गत शहरातील ३२ वॉर्डात टाकण्यात आलेले पाईप लाईनचे काम ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त झाले.काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. शहराची लोकसंख्या ८९ हजार ४५२ च्या घरात आहे.त्यानुसार प्राधिकरणाकडे नळधारक ग्राहकांची अधिकृत संख्या ९ हजार १६३ तर अनाधिकृत ग्राहकांची संख्या ८७ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहराला दररोज पाणी पुरविण्यात येत आहे.नळग्राहक जागृत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे २२ टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याची गळती आहे. नळाच्या तोट्या काढणे, मीटर काढणे, अवैध जोडणीला आळा घालणे सुरू असले तरी पाणी पुरवठा नळयोजना ६० लाखांच्या वर तोट्यात आहे.- एस.बी.येरणे, शाखा अभियंता, मजीप्रा बल्लारपूरपाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व तसेच तुटलेल्या पाइपमधून पाण्याची गळती अधिक आहे. याचा भुर्दंड प्रामाणिक नळधारककांना बसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण आणले तर शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते- संजय डुंबेरे, सामाजिक कार्यकर्तावर्धा नदीला मुबलक पाणी असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाई होत नाही जनतेच्या सहभागामुळे सर्वांना पाणी मिळते. नगर परिषदेने लावलेले २३० सार्वजनिक नळ बंद केल्या जात आहेत. आतापर्यंत ९२ नळ बंद केले आहे. जीवन प्राधिकरणच्या एक लिटरची पाण्याची बॉटल ग्राहकांना केवळ १८ पैशाला पडते.- सुशील पाटील,उपविभागीय अभियंता

टॅग्स :Waterपाणी