शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात दररोज २२ टक्के गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देजलवाहिन्या बदलविण्याचे काम सुरू। ४५ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

मंगल जीवने ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहरातील जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे दोन वर्षांपासून बदलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, सद्यस्थितीत दररोज सुमारे २२ टक्के जल गळती होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्या अंतर्गत शहरातील ३२ वॉर्डात टाकण्यात आलेले पाईप लाईनचे काम ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त झाले.काम पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होण्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सुशिल पाटील यांनी दिली आहे. दोन वर्षे आधी शहरात ६ कोटी खर्चून ३३ किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु शहराचा वाढत विस्तार पाहता राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे बल्लारपूर शहरातील जनतला २४ तास पाणी मिळण्यासाठी ६५ कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. शहराची लोकसंख्या ८९ हजार ४५२ च्या घरात आहे.त्यानुसार प्राधिकरणाकडे नळधारक ग्राहकांची अधिकृत संख्या ९ हजार १६३ तर अनाधिकृत ग्राहकांची संख्या ८७ आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहराला दररोज पाणी पुरविण्यात येत आहे.नळग्राहक जागृत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे २२ टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याची गळती आहे. नळाच्या तोट्या काढणे, मीटर काढणे, अवैध जोडणीला आळा घालणे सुरू असले तरी पाणी पुरवठा नळयोजना ६० लाखांच्या वर तोट्यात आहे.- एस.बी.येरणे, शाखा अभियंता, मजीप्रा बल्लारपूरपाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व तसेच तुटलेल्या पाइपमधून पाण्याची गळती अधिक आहे. याचा भुर्दंड प्रामाणिक नळधारककांना बसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण आणले तर शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते- संजय डुंबेरे, सामाजिक कार्यकर्तावर्धा नदीला मुबलक पाणी असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाई होत नाही जनतेच्या सहभागामुळे सर्वांना पाणी मिळते. नगर परिषदेने लावलेले २३० सार्वजनिक नळ बंद केल्या जात आहेत. आतापर्यंत ९२ नळ बंद केले आहे. जीवन प्राधिकरणच्या एक लिटरची पाण्याची बॉटल ग्राहकांना केवळ १८ पैशाला पडते.- सुशील पाटील,उपविभागीय अभियंता

टॅग्स :Waterपाणी