शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

भद्रावतीत निघाला बैलबंडी मोर्चा

By admin | Updated: December 6, 2014 01:17 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी भद्रनाग स्वामी मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत बैलबंडी-उभारी मोर्चा काढण्यात आला.

भद्रावती : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी भद्रनाग स्वामी मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत बैलबंडी-उभारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. मोर्चा दरम्यान काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.कापसाला ७ हजार ५०० रुपये, सोयाबिनला ५ हजार व धानाला ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २० हजार अनुदान देण्यात यावे, पिक कर्जाची मर्यादा ३० हजार प्रति एकर प्रमाणे देण्यात यावी, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करावी, रेतीघाटांचे लीलाव त्वरित करावे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानंतर नायब तहसीलदार किन्हेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन किन्हेकर यांनी दिले. या मोर्चात शेकडो शेतकरी बैलबंडीसह उपस्थित होते. भाजपा- शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना केवळ स्वप्ने दाखविली. ‘अच्छे दिन आयेगें’ च्या भुलथापा दिल्या. सरकार सत्तेत आल्यानंतर सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे विसरल्याचे माजी आमदास जनार्दन साळुंखे म्हणाले. शेतकऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला आहे. संविधाणाप्रमाणे चालणारे सरकार नाही. यांच्या विरोधात पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व विधानसभा माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले. सरकारने अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. केवळ आश्वासन देत सरकार वेळ मारून नेत असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत काळे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी भाजपा सरकारवर कडाडून टिका करीत केवळ आश्वासन देणारे सरकार असल्याचे म्हटले.मोर्चात अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे माजी आमदार जनार्दन साळुंखे, सुधाकर रोहणकर, सुनील महाने, किशोर पडवे, मुनाज शेख, शरद जिवतोडे, सुनील तेलंग, नयन जांभुळे, भोलाजी टोंगे, ईश्वर घांडे, माणूसमारे, पुंजाराम वाग्दरकर तसेच शेकडो शेतकरी बैलबंसडीसह सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)