शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

भद्रावतीत निघाला बैलबंडी मोर्चा

By admin | Updated: December 6, 2014 01:17 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी भद्रनाग स्वामी मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत बैलबंडी-उभारी मोर्चा काढण्यात आला.

भद्रावती : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी भद्रनाग स्वामी मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत बैलबंडी-उभारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. मोर्चा दरम्यान काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.कापसाला ७ हजार ५०० रुपये, सोयाबिनला ५ हजार व धानाला ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २० हजार अनुदान देण्यात यावे, पिक कर्जाची मर्यादा ३० हजार प्रति एकर प्रमाणे देण्यात यावी, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करावी, रेतीघाटांचे लीलाव त्वरित करावे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानंतर नायब तहसीलदार किन्हेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन किन्हेकर यांनी दिले. या मोर्चात शेकडो शेतकरी बैलबंडीसह उपस्थित होते. भाजपा- शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना केवळ स्वप्ने दाखविली. ‘अच्छे दिन आयेगें’ च्या भुलथापा दिल्या. सरकार सत्तेत आल्यानंतर सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे विसरल्याचे माजी आमदास जनार्दन साळुंखे म्हणाले. शेतकऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला आहे. संविधाणाप्रमाणे चालणारे सरकार नाही. यांच्या विरोधात पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व विधानसभा माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले. सरकारने अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. केवळ आश्वासन देत सरकार वेळ मारून नेत असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत काळे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी भाजपा सरकारवर कडाडून टिका करीत केवळ आश्वासन देणारे सरकार असल्याचे म्हटले.मोर्चात अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे माजी आमदार जनार्दन साळुंखे, सुधाकर रोहणकर, सुनील महाने, किशोर पडवे, मुनाज शेख, शरद जिवतोडे, सुनील तेलंग, नयन जांभुळे, भोलाजी टोंगे, ईश्वर घांडे, माणूसमारे, पुंजाराम वाग्दरकर तसेच शेकडो शेतकरी बैलबंसडीसह सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)