शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

ब्रह्मपुरीपासून ७ कि.मी.वरील भालेश्वर डांबरीरस्त्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अºहेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.

ठळक मुद्देकुणीही लक्ष देईना : उखडलेल्या गिट्टीच्या रस्त्यावरूनच ग्रामस्थांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुका मुख्यालयापासून अवघ्या ७ किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वैनगंगा नदी काठावर वसलेले व जवळपास दीड हजार लोकसंख्येचे भालेश्वर हे गाव अद्यापही डांबरी रस्त्याविना आहे. रस्त्याचे खडीकरण झाले. परंतु रस्ता उखडला आहे. गिट्टीच्या खडतर रस्त्यावरून भालेश्वरवासीयांना दररोज पायपीट करावी लागत आहे.देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अऱ्हेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.भाजीपाल्याचे गठ्ठेच्या गठ्ठे मोटारसायकल तसेच सायकलवरून शहरात न्यावे लागते. त्यावेळी या गावातील नागरिकांची चांगलीच दमछाक होते. येथील नागरिकांनी कित्येकदा शासनाकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली. परंतु वेळोवेळी शासनाने येथील नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.आता आमचा कोणीच वाली उरला नाही, अशी संतप्त भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे. आतातरी या मार्गावर सिमेंट तर सोडून द्या पण डांबरीकरण तरी करावे, अशी मागणी होत आहे. जागोजागी फुटलेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना आजपर्यंत अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक पडून जखमी झाले आहेत. काहींना तर रुग्णालयात उपचारासाठीसुद्धा दाखल करावे लागले आहे. मात्र झोपेचे सोंग घेऊन असलेल्या प्रशासनाला अजूनही जाग आली नाही.ब्रम्हपुरी पासून अवघ्या सात किमी अंतरावर असलेले भालेश्वर हे गाव तालुक्यात हिरव्या तसेच ताज्या भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असून शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त करून देणारे गाव आहे. कारण या गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रातील रेतीची अख्या विदर्भात प्रचंड मागणी आहे.येथील रेतीला चांगला भाव मिळत असल्याने रेती ठेकेदार येथील रेतीघाटाला चांगली बोली लावून सदर रेतीघाट लिलावात घेतात. मात्र सततच्या रेतीवाहतुकीमुळे भालेश्वर ते अऱ्हेर नवरगाव या तीन किमी खडीकरण झालेल्या रस्त्याची नेहमीच चाळण होते, हे विशेष.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास