शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

ब्रह्मपुरीपासून ७ कि.मी.वरील भालेश्वर डांबरीरस्त्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अºहेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.

ठळक मुद्देकुणीही लक्ष देईना : उखडलेल्या गिट्टीच्या रस्त्यावरूनच ग्रामस्थांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुका मुख्यालयापासून अवघ्या ७ किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वैनगंगा नदी काठावर वसलेले व जवळपास दीड हजार लोकसंख्येचे भालेश्वर हे गाव अद्यापही डांबरी रस्त्याविना आहे. रस्त्याचे खडीकरण झाले. परंतु रस्ता उखडला आहे. गिट्टीच्या खडतर रस्त्यावरून भालेश्वरवासीयांना दररोज पायपीट करावी लागत आहे.देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अऱ्हेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.भाजीपाल्याचे गठ्ठेच्या गठ्ठे मोटारसायकल तसेच सायकलवरून शहरात न्यावे लागते. त्यावेळी या गावातील नागरिकांची चांगलीच दमछाक होते. येथील नागरिकांनी कित्येकदा शासनाकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली. परंतु वेळोवेळी शासनाने येथील नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.आता आमचा कोणीच वाली उरला नाही, अशी संतप्त भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे. आतातरी या मार्गावर सिमेंट तर सोडून द्या पण डांबरीकरण तरी करावे, अशी मागणी होत आहे. जागोजागी फुटलेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना आजपर्यंत अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक पडून जखमी झाले आहेत. काहींना तर रुग्णालयात उपचारासाठीसुद्धा दाखल करावे लागले आहे. मात्र झोपेचे सोंग घेऊन असलेल्या प्रशासनाला अजूनही जाग आली नाही.ब्रम्हपुरी पासून अवघ्या सात किमी अंतरावर असलेले भालेश्वर हे गाव तालुक्यात हिरव्या तसेच ताज्या भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असून शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त करून देणारे गाव आहे. कारण या गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रातील रेतीची अख्या विदर्भात प्रचंड मागणी आहे.येथील रेतीला चांगला भाव मिळत असल्याने रेती ठेकेदार येथील रेतीघाटाला चांगली बोली लावून सदर रेतीघाट लिलावात घेतात. मात्र सततच्या रेतीवाहतुकीमुळे भालेश्वर ते अऱ्हेर नवरगाव या तीन किमी खडीकरण झालेल्या रस्त्याची नेहमीच चाळण होते, हे विशेष.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास