शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

ब्रह्मपुरीपासून ७ कि.मी.वरील भालेश्वर डांबरीरस्त्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अºहेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.

ठळक मुद्देकुणीही लक्ष देईना : उखडलेल्या गिट्टीच्या रस्त्यावरूनच ग्रामस्थांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुका मुख्यालयापासून अवघ्या ७ किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वैनगंगा नदी काठावर वसलेले व जवळपास दीड हजार लोकसंख्येचे भालेश्वर हे गाव अद्यापही डांबरी रस्त्याविना आहे. रस्त्याचे खडीकरण झाले. परंतु रस्ता उखडला आहे. गिट्टीच्या खडतर रस्त्यावरून भालेश्वरवासीयांना दररोज पायपीट करावी लागत आहे.देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अऱ्हेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.भाजीपाल्याचे गठ्ठेच्या गठ्ठे मोटारसायकल तसेच सायकलवरून शहरात न्यावे लागते. त्यावेळी या गावातील नागरिकांची चांगलीच दमछाक होते. येथील नागरिकांनी कित्येकदा शासनाकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली. परंतु वेळोवेळी शासनाने येथील नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.आता आमचा कोणीच वाली उरला नाही, अशी संतप्त भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे. आतातरी या मार्गावर सिमेंट तर सोडून द्या पण डांबरीकरण तरी करावे, अशी मागणी होत आहे. जागोजागी फुटलेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना आजपर्यंत अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक पडून जखमी झाले आहेत. काहींना तर रुग्णालयात उपचारासाठीसुद्धा दाखल करावे लागले आहे. मात्र झोपेचे सोंग घेऊन असलेल्या प्रशासनाला अजूनही जाग आली नाही.ब्रम्हपुरी पासून अवघ्या सात किमी अंतरावर असलेले भालेश्वर हे गाव तालुक्यात हिरव्या तसेच ताज्या भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असून शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त करून देणारे गाव आहे. कारण या गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रातील रेतीची अख्या विदर्भात प्रचंड मागणी आहे.येथील रेतीला चांगला भाव मिळत असल्याने रेती ठेकेदार येथील रेतीघाटाला चांगली बोली लावून सदर रेतीघाट लिलावात घेतात. मात्र सततच्या रेतीवाहतुकीमुळे भालेश्वर ते अऱ्हेर नवरगाव या तीन किमी खडीकरण झालेल्या रस्त्याची नेहमीच चाळण होते, हे विशेष.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास