शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बगलवाडीचे कोलाम जगतात उपेक्षितांचे जिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:51 IST

राज्याच्या शेवटच्या टोकावरील बगलवाडी या अतिदुर्गम व जंगलाच्या सानिध्यात वसलेले गाव. येथील आदिवासी कोलाम बांधवांना अजूनही नरकयातना सहन कराव्या लागत आहे. डबक्यातील पाणी पिऊन जीवन जगावे लागत आहे.

ठळक मुद्देनरकयातना : योजनांचा लाभ नाही

आनंद भेंडे ।आॅनलाईन लोकमतराजुरा : राज्याच्या शेवटच्या टोकावरील बगलवाडी या अतिदुर्गम व जंगलाच्या सानिध्यात वसलेले गाव. येथील आदिवासी कोलाम बांधवांना अजूनही नरकयातना सहन कराव्या लागत आहे. डबक्यातील पाणी पिऊन जीवन जगावे लागत आहे. वारंवार ओरड करूनही त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ नाही. त्यामुळे बगलवाडीतील नागरिक उपेक्षितांचे जिणे जगत आहेत.बगलवाडी येथे आदिम कोलामाची ३० घरांची वस्ती आहे. तेथील लोकसंख्या १०० च्या वर आहे. कोलाम ही जमात गावापासून दूर राहते. हे बांधव वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहे. हेच त्यांचे जीवन जगण्याचे साधन आहे. अशिक्षिततेमुळे त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोणीच वाली नसल्याचे दिसत असल्याने नाईलाजाने ते वर्षानुवर्षांपासून खडतर आयुष्य जगत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने बागलवाडीला भेट दिली असता त्यांची केविलवाणी स्थिती दिसून आली. कुठल्याही सोई-सवलती त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याचे दिसून आले. सुमारे १० वर्षांपासून पाण्याची सोय नसल्यामुळे गावाजवळील नाल्याच्या बाजुला खड्डा खोदून त्यातील पाणी ते पित आहेत.वनविभागाच्या जमिनीवर कोलाम बांधवांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी वनविभागाकडून ना हरकत पत्र मिळविलेले नाही. त्यामुळे त्यांना सोयी, सवलती उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण झाली आहे.- ओमप्रकाश रामावतसंवर्ग विकास अधिकारी, पं.स. राजुरा