शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लाडज घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष

By admin | Updated: July 13, 2016 02:01 IST

ब्रह्मपुरी जिल्ह्यातील लाडज येथील नाव बुडणयच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक : यंत्रणेला दिले दक्षतेचे आदेश चंद्रपूर : ब्रह्मपुरी जिल्ह्यातील लाडज येथील नाव बुडणयच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रशासनातील बचाव पथक केव्हाचेच दक्ष असले तरी मंगळवारच्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्वांना पुन्हा दक्षतेचे आणि तत्पर राहण्याचे आदेश बैठकीतून दिले आहे. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. या सततच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून मार्गही बंद झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात आपतग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेवून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी तातडीच्या बैठकीतून दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता जी.एम.शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, दूगार्पूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता बोरुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पावसामुळे जिथे परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे, तेथे तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरीकांच्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. इरई किंवा अन्य धरणातून पाणी सोडावे लागत असल्यास नदी काठावरील गावातील नागरिकांना एसएमएसद्वारे सूचना दिली जावी, असे त्यांनी सुचविले. (जिल्हा प्रतिनिधी)