शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

लाडज घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष

By admin | Updated: July 13, 2016 02:01 IST

ब्रह्मपुरी जिल्ह्यातील लाडज येथील नाव बुडणयच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक : यंत्रणेला दिले दक्षतेचे आदेश चंद्रपूर : ब्रह्मपुरी जिल्ह्यातील लाडज येथील नाव बुडणयच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत प्रशासनातील बचाव पथक केव्हाचेच दक्ष असले तरी मंगळवारच्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्वांना पुन्हा दक्षतेचे आणि तत्पर राहण्याचे आदेश बैठकीतून दिले आहे. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. या सततच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून मार्गही बंद झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात आपतग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेवून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी तातडीच्या बैठकीतून दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता जी.एम.शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, दूगार्पूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता बोरुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पावसामुळे जिथे परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे, तेथे तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरीकांच्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. इरई किंवा अन्य धरणातून पाणी सोडावे लागत असल्यास नदी काठावरील गावातील नागरिकांना एसएमएसद्वारे सूचना दिली जावी, असे त्यांनी सुचविले. (जिल्हा प्रतिनिधी)