शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

प्लास्टिक निर्मूलनासाठी तयार झाले बर्तन बॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद मूलने बर्तन बॅक ही अभिनय योजना सुरू केली आहे. या योजनेंअतर्गत घरगुती कार्यक्रम, समारंभ, पूजा, उत्सव, लग्न कार्य आदी कार्यक्रमासाठी स्टीलचे ताट, ग्लास, चमचे, इत्यादी भांडे अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात एक ताट, दोन वाट्या, एक चमच, एक ग्लास असा एक संच असुन प्रति संच एक रुपया याप्रमाणे रक्कम घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देमूल नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम : इतर नगरपालिकेसाठी प्रेरणादायी

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमहाराष्ट्र शासनाने प्लास्टिक निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम राबवून जनजागृती केली. मात्र आडमार्गाने काही दुकानदार प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री करताना दिसत होते. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुकानांवर धाड टाकून कारवाई करून दंड सुध्दा ठोठावला. मात्र विविध कार्यक्रमात प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने मूल नगरपरिषदेने प्लास्टिक निर्मूलनासाठी ‘बर्तन बॅक’ ही नविन कल्पना साकारली आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद मूलने बर्तन बॅक ही अभिनय योजना सुरू केली आहे. या योजनेंअतर्गत घरगुती कार्यक्रम, समारंभ, पूजा, उत्सव, लग्न कार्य आदी कार्यक्रमासाठी स्टीलचे ताट, ग्लास, चमचे, इत्यादी भांडे अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात एक ताट, दोन वाट्या, एक चमच, एक ग्लास असा एक संच असुन प्रति संच एक रुपया याप्रमाणे रक्कम घेतली जाणार आहे. ही अभिनय योजना सुरू करण्यासाठी नगरपरिषद मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन सदर योजना प्लास्टिक निर्मूलनासाठी कशी उपयुक्त राहील, यावर आपले मत व्यक्त केले.मूल शहरात प्लास्टिक निर्मूलनासाठी बर्तन बॅक ही अभिनव योजना उपयुक्त राहील, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केल्यानंतर ही योजना अमलात आणण्यासाठी योजनेला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यामुळे ही बर्तन योजना अमलात आली आहे. दिवसेंदिवस प्लास्टिकचा होत असलेला वापर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यावर उपाय म्हणजे शहरवासीयांना प्रत्यक्षरित्या स्टीलच्या भांडयाचा वापर करणे हाच एकमेव पर्याय असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. या उपक्रमांमुळे मूल शहरातील नागरिकांना अल्प किंमतीत भांडे उपलब्ध होणार असल्याने प्लास्टिकचा वापर आपोआपच कमी होऊन नागरिकांचा बर्तन बॅककडे कल वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला व्यापक स्वरूप यावे, प्लास्टिक निर्मूलनासाठी एक व्यापक व कायमस्वरुपी योजना अमलात आणण्यासाठी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सहकार्याने बर्तन बॅक ही अभिनव योजना अमलात आणली. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळेल व प्लास्टिकचे निर्मूलन आपोआपच होईल, असा विश्वास वाटतो.- विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी न. प. मूल.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी