शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

बाबासाहेबांचे विचार माणुसकीला श्रेष्ठ बनविणारे

By admin | Updated: April 15, 2016 01:19 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.

सुधीर मुनगंटीवार : जयंतीनिमित्त क्रांतीसूर्याला अभिवादनचंद्रपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून माणुसकीला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करू या, असे आवाहन वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व मनपा आयुक्त सुधीर शंभरकर हे यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचावे, यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १७० कोटींची तरतूद केली असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेबांनी लंडन येथे वास्तव्य केलेले घर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतले आहे. इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बाबासाहेबांचा आई-वडिलांचे वास्तव्य असलेल्या गावाचा तसेच माई रमाबार्इंच्या गावाचासुध्दा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचे ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंती समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या वर्षात करण्यात येणार आहे. आपणही त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प करू या, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला असंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)