शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

बाबासाहेबांचे विचार माणुसकीला श्रेष्ठ बनविणारे

By admin | Updated: April 15, 2016 01:19 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.

सुधीर मुनगंटीवार : जयंतीनिमित्त क्रांतीसूर्याला अभिवादनचंद्रपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून माणुसकीला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करू या, असे आवाहन वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व मनपा आयुक्त सुधीर शंभरकर हे यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचावे, यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १७० कोटींची तरतूद केली असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेबांनी लंडन येथे वास्तव्य केलेले घर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतले आहे. इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बाबासाहेबांचा आई-वडिलांचे वास्तव्य असलेल्या गावाचा तसेच माई रमाबार्इंच्या गावाचासुध्दा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचे ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंती समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या वर्षात करण्यात येणार आहे. आपणही त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प करू या, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला असंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)