शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

२०५ विद्यार्थ्यांना मिळणार बाबा आमटे पुरस्कार

By admin | Updated: February 28, 2015 01:16 IST

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या स्व. बाबा आमटे गुणवत्ता पुरस्कारासाठी २०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या स्व. बाबा आमटे गुणवत्ता पुरस्कारासाठी २०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. योजना एकमध्ये गुणवत्ताप्राप्त ७२ तर, योजना दोनमध्ये १३३ दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. मात्र या शाळांत शिकणारे विद्यार्थ्यी कुठेही मागे नाही. इयत्ता दहावी आणि बारावी पास झालेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा सोबतच दारिद्रय रेषाखालील असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाकरिता सहाय्याता मिळण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १० वी व १२ वी पास गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांची तर दारिद्रय रेषेखालील असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी चार लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये पुरस्कार स्वरुपात देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे वितरण राजुरा येथे शनिवारी करण्यात येणार आहे.नवरत्न स्पर्धेत २२० विद्यार्थी घेणार सहभागजिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्व. यशवंतराव चव्हाण नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नवरत्न पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी २२० विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये प्राथमिक गटात कथाकथन, स्वयंस्फूर्त भाषा, वादविवाद, एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धा २८ फेब्रुवारीला इन्फंट जिजस हायस्कूल राजुरा येथे होणार आहे. उच्चप्राथमिक व प्राथमिक गटात कथाकथन, स्वयंस्फूर्त, कथाकथन, स्वयंस्फूत भाषण, वादविवाद, एकपात्री, बुद्धीमापन, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, स्वयस्फूर्त भाषण, स्वयंस्फूर्त लेखन, स्मरणशक्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा महात्मा जोतिबा फुले विद्यालय राजुरा येथे होणार आहे.