फुटपाथवर वाहन आडवे; पादचारी त्रस्त
चंद्रपूर : महानगरपालिकेने पादचाºयांना चालण्यासाठी रस्त्याच्या बाजुला फुटपाथ तयार केले आहे. मात्र अनेक ठिकाणी या फुटपाथवर व्यावसायिकांनी व वाहनधारकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हॉयस्कूलच्या जवळ असलेल्या दुसºया बाजुच्या फुटपाथवर नेहमीच वाहन आडवे लावून ठेवले जाते. यामुळे पादचाºयांना फुटपाथवरून जाताना रस्त्यावर येऊन परत फुटपाथवर चढावे लागते. विशेष म्हणजे, जिथे वाहन आडवे असते, तिथेच विजेची डिपी आहे.
गंज वॉर्डातून जड वाहतुक बंद करावी
चंद्रपूर : गंजवार्डमध्ये भाजी तसेच धान्य बाजार आहे. गंजवॉर्डामध्ये सरदार पटेल कॉलेज, खासगी दवाखाने, बँकासुद्धा आहेत. याच परिसरातील सीटी हायस्कूल, हिंदी सिटी हायस्कूल, ज्युबिली हायस्कूल, काही मंगल कार्यालयेही आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी जड वाहने रस्त्यावर ठेवू नये. पोलिसांनी या वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघातग्रस्तस्थळांवर फलक लावा
चंद्रपूर: शहरातील प्रवण स्थळांवर फलक नसल्याने अपघाताचा धोका आहे. या स्थळांवर फलक लावण्याची मागणी होत आहे. मनपा तसेच बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन फलके लावावी. काही स्थळांवरील फलक नागरिकांनी चोरून नेले. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतूक
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, पोलीस व परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अवधै प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत असून यात काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूृकदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरू करा
जिवती :तालुक्यातील बहुतांश नागरिक शेती करतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांजवळ पाळीव जनावरे आहेत. त्यांना विविध प्रकारचे रोग होऊ नये, यासाठी लसीकरण मोहीम सुरू करावी़ ग्रामपंचायतींना या उपक्रम सहभागी करावे, अशी मागणी तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे़
शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव
वरोरा: तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव आहे. कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून सासकीय कार्यालयातील शौचालय सामान्य नागरिकांसाठी सुुर करण्याची मगणी करण्यात आली आहे.
वेगवान वाहनांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : येथील पडोली परिसरात बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. धोकादायक व वर्दळीच्या वळणावरही वाहन चालक वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने आणि वीज पुरवठा खंडित झाल्यास परिणाम पडत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने कर्मचाºयांची नियुक्ती करून गाव तिथे लाईनमन द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.